शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:20 IST

वाहन उद्योगात मंदीचे संकट गहिरे : मानेसरमधील तीन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता

गुरूग्राम : हरयाणातील मानेसरच्या बेल्सोनिका कॉर्पोरेशन या वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाºया उद्योगातील ४०० कामगारांना नोकरीतून कमी करण्यात आले. मोटारींचे सुटे भाग तयार करणाºया कंपन्यांवर थेट व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या कामगारांना आपली नोकरी कधीही जाईल, अशी भीती वाटत आहे.

देशभरातील वाहनउद्योगांना लागणाºया सुट्या भागांच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन मानेसर येथे होते. मारुती सुझूकी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प लिमिटेड, होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट या तीन प्रमुख कंपन्यांसाठी वाहनांचे सुटे भाग बनविण्याचे सुमारे ६५० कारखाने मानेसरमध्ये आहेत. त्यामध्ये बेल्सोनिका कॉर्पोरेशन, मुंजाल शोवा, रिको आॅटो युनियन, ल्यूमॅक्स ग्रुप, नॅपिनो आॅटो या मोठ्या कंपन्या दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करतात. मानेसरच्या या कंपन्यांमध्ये सुमारे६ लाख कामगार आहेत.

काही वाहनउद्योगांनी दहा दहा दिवस कारखाने बंद ठेवले असून कर्मचारीकपातीचाही इशारा दिला आहे. हे सारे घडते आहे; कारण देशात गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी मंदी आली आहे. त्यामुळे या उद्योगावर सध्या निराशेचे सावट पसरले आहे.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात वाहनांची विक्री ३९ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून वाहनविक्रीत घसरण सुरू असून ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंदीचा फटका तेथील कामगार, या उद्योगांवर अवलंबून असलेले लघुउद्योग, विक्रेते अशा साऱ्यांनाच बसत आहे. देशभरात अदमासे ३ लाख लोक वाहनउद्योगातील मंदीमुळे बेकार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)मारुतीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमीवाहनविक्रीतील मंदी इतकी तीव्र आहे की त्याच्या झळा लागल्यामुळे मानेसरमधील कंपन्यांत गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे एक लाख लोकांना नोकरी गमवावी लागली असल्याचे मारुती सुझुकी कामगार युनियनचे सरचिटणीस कुलदीप झांगू यांनी म्हटले आहे. कामगारकपातीमुळे वाहनउद्योग व तेथील कामगार संघटना यांच्यातील तणावही वाढला आहे. मारुती सुझुकीने तीन हजार कंत्राटी कामगारांना नोकरीवरून काढून टाकले आहे. आणखी ४०० जणांना विनापगारी सहा महिन्यांच्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. या उद्योगाच्या दोन्ही प्लांटमधील उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.

नाशिकमधील ‘बॉश’चे उत्पादन आठ दिवस बंद; कंत्राटी कामगारांचेही हाल दिवसेंदिवस वाहन विक्रीत प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी बॉशने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता सोमवारपासून आठ दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद झाल्याने महिंद्रासारख्या मोठ्या उद्योगांवर आधारित लघुउद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून वाहनउद्योग संकटात आहे, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरुवात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे.वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट झाल्याने नाशिकमधील महिंद्रा आणि बॉश कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्यात सहा दिवस बॉश कंपनीचे कामकाज बंद होते आणि चालू महिन्यात आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम वेंडर असलेल्या लघुउद्योगांवर झाला आहे. 

नाशिकच्या कारखान्यातील काही उत्पादन थांबवण्यात आले असून, ते नाशिकऐवजी जयपूरच्या कारखान्यात होत आहे. त्याबदल्यात नवीन उत्पादन होेणे अपेक्षित होते. तसेच कंपनी व्यवस्थापनाने बदलत्या परिस्थितीनुसार नवीन उत्पादन नाशिक प्लांटमध्ये आणणे आवश्यक होते. आठ दिवस उत्पादन बंद ठेवल्याने त्याचा परिणाम १३५० कायम कामगारांप्रमाणेच ९०० हंगामी कामगारांवर झाला आहे. कायम कामगारांना पगारी सुटी असली तरी ९०० हंगामी कामगार आणि जवळपास ६०० कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अन्य कारखान्यांतील कामगारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने औद्योगिक मंदीवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.- प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार संघटना

टॅग्स :Automobileवाहन