शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Mumbai Marathon 2019 : भारतीय महिलांमध्ये सुधा सिंगची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:00 IST

भारतीय पुरुष गटात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या धावपटूंनी दबदबा राखताना पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला.

मुंबई : भारतीय पुरुष गटात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या धावपटूंनी दबदबा राखताना पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला. मूळचा आंध्र प्रदेशचा असलेल्या श्रीनू बुगाथा याने सुवर्ण पदक जिंकले. शेर सिंग आणि दुर्गाबहादूर बुधा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. महिलांमध्ये भारतीय रेल्वेच्या सुधा सिंगने हॅट्ट्रिक नोंदविताना मुंबई मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी महाराष्ट्राच्या ज्योती गवते आणि पश्चिम बंगालच्या श्यामली सिंग यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.यंदा टोकियो येथे होणाºया आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यास पुरुषांसाठी २:११:३०, तर महिलांसाठी २:२९:३० अशी पात्रता वेळ आहे. मात्र, भारतीय गटात श्रीनूने २:१८:४४ अशी वेळ देत बाजी मारली असल्याने त्याला आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता अधिक मेहनत घ्यावी लागेल, तसेच महिलांमध्ये विजेत्या ठरलेल्या सुधा सिंगलाही आपल्या वेळेत सुधारणा करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. कारण तिने २:४५:३० अशी वेळ देत सुवर्ण पटकावले.महिलांमध्ये सर्वांचे लक्ष सुधा सिंगवर होते आणि तिने अपेक्षित कामगिरी करताना सलग तिसऱ्यांदा मुंबई जिंकली. दुखापतीनंतर स्पर्धेत धावत असल्याने, यावेळी तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेकडून कडवी टक्कर मिळेल अशी चर्चा होती. मात्र, २२ किमी अंतर पार केल्यानंतर ज्योतीने पाणी घेण्यासाठी आपला वेग काहीसा कमी केला आणि हीच संधी साधत सुधाने मोठी आघाडी घेत २:४५:३० अशा वेळेसह सुवर्ण जिंकले. ‘मी जर पाणी पिण्यासाठी वेग कमी केला नसता, तर कदाचित सुधाताईला मी मागे टाकले असते,’ अशी खंत व्यक्त केलेल्या ज्योतीने २:४९:१४ अशा वेळेसह रौप्य मिळविले. सहाव्यांदा तिने मुंबई मॅरेथॉनच्या पोडियमवर स्थान मिळविले हे विशेष. त्याच वेळी पश्चिम बंगालच्या श्यामली सिंगला २:५८:४४ अशा वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.पुरुषांमध्ये आर्मी धावपटूंनी एकहाती वर्चस्व राखले. श्रीनूने सुमारे सहा मिनिटांचे मोठे अंतर ठेवून बाजी मारली. भारतीय गटामध्ये श्रीनूने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. त्यामुळे जी काही चुरस होती ती रौप्य व कांस्य पदकासाठीच रंगली. यामध्ये शेर सिंगने रौप्य पटकावताना २:२४:०० अशी वेळ दिली, तर दुर्गाबहादूर बुधाला २:२४:०३ अशा वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.पाण्याचा विचार केला नसता तर...मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय महिला गटात परभणीच्या ज्योती गवतेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यासाठी एक चूक महागात पडल्याचे ज्योतीने ‘लोकमत’ला सांगितले. ज्योतीने सुरुवातीपासून आघाडी राखत सुधाला कडवी टक्कर दिली. ज्योती २२ किमीपर्यंत आघाडीवर होती. मात्र, यावेळी तिने पाण्याची बाटली घेण्यासाठी वेग काहीसा कमी केला आणि याच वेळी सुधाने संधी साधत आघाडी घेत सुवर्ण हॅट्ट्रिक पूर्ण केली. हीच खंत व्यक्त करताना ज्योती म्हणाली की, ‘जर मी पाणी घेण्याचा विचार केला नसता, तर कदाचित मी सुधाला मागे टाकले असते.’ज्योतीला माझा सलाम!सुधा सिंगने ज्योती गवतेचे विशेष कौतुक करताना तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीला सलाम ठोकला. सुधाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण यासाठी तिने पूर्ण वेळ सरावा देऊन आपली ओळख निर्माण केली. दुसरीकडे ज्योतीनेही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असला, तरी त्याच वेळी तिने घराची जबाबदारीही सांभाळली आहे. याच गोष्टीचे कौतुक करताना सुधा म्हणाली की, ‘ज्योतीची कामगिरी आमच्यासाठी आश्चर्य आहे. व्यावसायिक धावपटू होण्यासाठी तुम्हाला सरावासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, परंतु ज्योती घराची जबाबदारी सांभाळून आपला सराव करते. केवळ सरावच नाही, तर ती सातत्याने आघाडीवर राहते. तिची मेहनत पाहून आम्ही थक्क होतो. ती हे सर्व कशा प्रकारे करते हे तिलाच ठाऊक.’ 

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन