शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

भालाफेकपटू नीरजकडून पदकाची आशा, विश्व अ‍ॅथलेटिक्स आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:20 IST

‘वायुवेगाला पर्याय’ असलेला उसेन बोल्ट याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे २५ खेळाडूंचे पथक सहभागी होत असून

लंडन : ‘वायुवेगाला पर्याय’ असलेला उसेन बोल्ट याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे २५ खेळाडूंचे पथक सहभागी होत असून, विश्वविक्रमाला गवसणी घालणारा ज्युनियर भालाफेकपटू नीरज चोपडा याच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.हरियाणाचा १९ वर्षांचा नीरज १० आणि १२ आॅगस्ट रोजी पात्रता तसेच फायनल खेळणार आहे. १९८३ साली विश्व चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून भारत स्पर्धेत सहभागी होत आला आहे. तथापि, २००३ मध्ये लांब उडीतील खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिने जिंकलेल्या कांस्यपदकाचा अपवाद वगळता भारताला फारसे यश मिळाले नाही.विश्व स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बराच वाद झाला. १५०० मीटरमध्ये धावणारी पी. यू. चित्रा हिने न्यायालयाचे दार ठोठावले. महिलांच्या २० किमी शर्यतीत सहभागी होणारी खुशबीर कौर, एम. आर. पुवम्मा, जिश्ना मॅथ्यू आणि अनुराघवन यांचा रिले संघ अनुभवी असला तरी अनेक चेहरे नवखे आहेत. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकमेव पदक जिंकले असल्याने, कुणी खेळाडू अंतिम फेरीत पोहोचला तरी मोठी उपलब्धी ठरणार आहे. आशियाई चॅम्पियन गोविंदन लक्ष्मण १० हजार मीटरच्या फायनलमध्ये भाग घेऊ शकणार नाही. भुवनेश्वरमध्ये सुवर्ण जिंकूनही तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. भारतीय खेळाडूंची पहिली स्पर्धा ५ आॅगस्ट रोजी होईल. स्वप्ना बर्मन हेप्टथलानच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सहभागी होणार असून, पुरुषांच्या ४०० मीटर हिटमध्ये मोहम्मद अनस धावणार आहे.महिलांच्या ४०० मीटर दौडमध्ये निर्मला शेरॉन प्रतिनिधित्व करेल. पुरुष अडथळा शर्यतीत सिद्धांत थिंगाल्या आशियाई स्पर्धेत पाचव्या स्थानावर होता. त्याच्याकडूनही फारशा आशा नाहीत. पाच हजार मीटरमध्ये लक्ष्मण हा सुरुवातीचा अडथळा पार करेल, असे वाटत नाही. महिला भालाफेकीत अनुराणी ही ६१.८६ मीटरपेक्षा अधिक भालाफेक करू शकली तरी आश्चर्य घडेल. कोटा नियमामुळे अंतिम क्षणी संघात आलेली वेगवान धावपटू दुती चंद ही देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत केटी इरफान, देवेंद्रसिंग आणि गणपती कृष्णन यांचा समावेश असेल. टी. गोपी आणि मोनिका आठरे हे मॅरेथॉन धावपटू आहेत. ४ बाय ४०० मीटर रिले संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला तरी मोठी उपलब्धी ठरेल. (वृत्तसंस्था)नीरजने ८५.६३ मी.भालाफेक करीत विश्वविक्रम नोंदविला असल्याने, तो पदकांच्या शर्यतीत राहू शकतो. सध्याचा आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन थॉमस रोहलेर याने ९० मीटर तसेच अन्य आठ खेळाडंूनी ८७.६४ मी.पर्यंत भालाफेक केली आहे. नीरजला स्वत:ची कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. यंदा त्याने तीनवेळा ८५मी. अंतर गाठले.बर्लिंन येथे २००९मध्ये १०० मी. धावण्याच्या शर्यतीत ९.५८ वेळेची नोंद करून विश्वविक्रम करणाºया जमैकाचा उसेन बोल्ट या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आॅलिम्पिकमध्ये ८,वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ११,सुवर्ण पदके जिंकणाºया उसेन बोल्टची या स्पर्धेतील शेवटची धाव असेल