शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी झिरो पेंडन्सीपासून कोसोदूर

By admin | Updated: July 5, 2017 00:49 IST

जिल्हा परिषदेत दाखल होणाऱ्या फायलींची सद्यस्थिती (फाईल्स स्टेटस) सांगणारी ई- टॅ्रकिंग प्रणाली अद्याही मिनीमंत्रालयात कोसोदूर आहे.

केव्हा लागणार शिस्त ? : प्रशासकीय फायलींचा वेग मंदावलाजितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत दाखल होणाऱ्या फायलींची सद्यस्थिती (फाईल्स स्टेटस) सांगणारी ई- टॅ्रकिंग प्रणाली अद्याही मिनीमंत्रालयात कोसोदूर आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात दिवसेंदिवस फाईलींचा ढीग वाढत चालला आहे. परिणामी झीरो पेंडन्सीपासून प्रशासनही उदासीन असल्याचे चित्र कायम आहे.जिल्हा परिषद म्हणजे मिनीमंत्रालय या ठिकाणी अनेक विभाग आहेत. जिल्हा परिषदेत दाखल होणारी फाईल ही एकाच विभागातून न जाता वेगवेगळया विभागातून फिरत मंजुरीपर्यंतचा प्रवास पूर्ण करीत असते. मात्र फायलींचा हा प्रवास फार दिरंगाईचा असतो. शिवाय काही कर्मचाऱ्यांच्या हव्यासापोटी या फायलीचा प्रवास लांबतो. त्यामुळे झिरो पेंडन्सी, ई-ट्रॅकिंग यासारख्या योजना राबविणे आवश्यक आहे. या सर्व प्रकरांना आळा बसविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही पुढाकार घेतला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.झीरो पेंडन्सी अभियानाचे धोरण शासनाने ठरवून दिले आहे. त्यानुसार यांची जिल्हा परिषदेत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळेच दिवसे दिवस जिल्हा परिषदेत ग्रामिण भागातील नागरिकांच्या कामांच्या तसेच प्रशासनातील प्रशासकीय कामकाजाच्या फाईलींचा प्रवास सुकर होण्याऐवजी किचकट होत असून महिनोगिणती या फायलींचा निपटारा होत नसल्याची अनेक उदारणे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात दिसून येत आहे. जि.प.च्या संबंधित विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांकडे येणारी फाईल तत्काळ मार्गस्थ झालीच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. याबाबतचा आढावाही होणे अपेक्षित आहे. मात्र यापैकी एकही बाब ही गांभिर्याने घेतली जात नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स न्याय निवाड्याअभावी रखडल्या आहेत. अनेक फायली तर वेळीच नोंद होत नसल्यामुळे वेळेवर दिसत नसल्याचेही कित्येक उदारणे मिनीमंत्रालयात दिसून येत आहेत. एकंदरीत जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणा ई- ट्रकिंग व झिरो पेंडन्सीपासून अद्याप तरी दूर असल्याचे चित्र राज्यभरातील इतर जिल्हा परिषदेच्या तुलनेत कोसोदूर असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रशासन कसे होईल गतिमान ? प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी शासन आग्रही आहे. मात्र शासन आग्रही असले तरी ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांची कामे कशी सुलभ होतील,हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाच्या अपेक्षा लक्षात घेता जिल्हा परिषदेत ई-टॅ्रकिंगसोबतच झिरो पेंडन्सी प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठांनी यावर भर देण्याची गरज आहे. त्याशिवाय शासकीय कामकाज गतिमान होणे कठीण आहे.