शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

झेडपी समाजकल्याणचा कारभार ‘प्रभारी’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देयोजना प्रभावित : तीन वर्षांनंतरही मिळेना कायमस्वरूपी अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला साधारणत: तीन वर्षांनंतरही प्रमुख मिळाला नसून अजूनही या विभागाचा कारभार प्रभारी मार्फत सुरू आहे. अधिकारीच नसल्याने मागासवर्गीय बरोबरच दिव्यांगांच्याही योजनांना राबविताना कसरत होत आहे.समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे समाजकल्याण अधिकाऱ्यांचे रिक्त असलेले पद भरण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्याच्या स्थितीत समाजकल्याण विभागाचा हा प्रभार महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.अगोदरच महिला व बालकल्याण विभागाकडे मेळघाटातील कुपोषण अन्य महत्त्वाच्या योजनांची जबाबदारी सोपविली आहे. असे असताना याठिकाणी मात्र समाजकल्याण विभागाचाही महत्वपूर्ण प्रभार देण्यात आला आहे. एकाच अधिकाºयावर दोन महत्वाच्या विभागाचा कारभार सांभाळावा लागत आहे. जिल्हाभरातील मागासवर्गीय समाजाच्या विविध योजनांवर परिणाम हंोत आहे. त्यामुळे शासनाने किमान आतातरी समाज कल्याण विभागाला कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिव्यांगांनाही प्रतीक्षामागासवर्गीय तसेच दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया महत्त्वपूर्ण योजनांसाठी नियमित अधिकारी कधी मिळणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. विविध योजनांचा लांब देण्यासाठी याठिकाणी दिव्यांगानाही कायमस्वरूपी अधिकाºयाची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यादृष्टिने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आहे.राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकाºयांचे रिक्त पद भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. अशातच आता नवीन सरकार आल्यामुळे समाजकल्याण अधिकाºयांचे पद भरण्यासाठी शासनाकडे स्वत: पुन्हा पाठपुरावा करू.- सुशिला कुकडे,सभापती,समाजकल्याण समिती

टॅग्स :zpजिल्हा परिषद