शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

झेडपी समाजकल्याणचा कारभार ‘प्रभारी’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देयोजना प्रभावित : तीन वर्षांनंतरही मिळेना कायमस्वरूपी अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला साधारणत: तीन वर्षांनंतरही प्रमुख मिळाला नसून अजूनही या विभागाचा कारभार प्रभारी मार्फत सुरू आहे. अधिकारीच नसल्याने मागासवर्गीय बरोबरच दिव्यांगांच्याही योजनांना राबविताना कसरत होत आहे.समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मिळाल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवरच कामकाज सुरू आहे. परिणामी एकाच अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी दिल्यामुळे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे समाजकल्याण अधिकाऱ्यांचे रिक्त असलेले पद भरण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्याच्या स्थितीत समाजकल्याण विभागाचा हा प्रभार महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.अगोदरच महिला व बालकल्याण विभागाकडे मेळघाटातील कुपोषण अन्य महत्त्वाच्या योजनांची जबाबदारी सोपविली आहे. असे असताना याठिकाणी मात्र समाजकल्याण विभागाचाही महत्वपूर्ण प्रभार देण्यात आला आहे. एकाच अधिकाºयावर दोन महत्वाच्या विभागाचा कारभार सांभाळावा लागत आहे. जिल्हाभरातील मागासवर्गीय समाजाच्या विविध योजनांवर परिणाम हंोत आहे. त्यामुळे शासनाने किमान आतातरी समाज कल्याण विभागाला कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दिव्यांगांनाही प्रतीक्षामागासवर्गीय तसेच दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया महत्त्वपूर्ण योजनांसाठी नियमित अधिकारी कधी मिळणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. विविध योजनांचा लांब देण्यासाठी याठिकाणी दिव्यांगानाही कायमस्वरूपी अधिकाºयाची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यादृष्टिने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आहे.राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकाºयांचे रिक्त पद भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. अशातच आता नवीन सरकार आल्यामुळे समाजकल्याण अधिकाºयांचे पद भरण्यासाठी शासनाकडे स्वत: पुन्हा पाठपुरावा करू.- सुशिला कुकडे,सभापती,समाजकल्याण समिती

टॅग्स :zpजिल्हा परिषद