शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

झेडपीत पुन्हा "काँग्रेस राज"

By admin | Updated: April 4, 2017 00:21 IST

भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही ...

विषय समिती निवडणूक : सुशीला कुकडे, वनिता पाल, जयंत देशमुख, बळवंत वानखडेंची वर्णीअमरावती: भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आणि शिवसेना या आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला. चारपैकी दोन समित्या काँग्रेसने राखल्या, तर राष्ट्रवादी व रिपाइंलाही सत्तेत वाटा मिळाला. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या वनिता पाल, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीला कुकडे यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे जयंत देशमुख आणि रिपाइंचे बळवंत वानखडे यांची विषय समिती सभापती म्हणून निवड झाली आहे. या दोघांसह उपाध्यक्षांचे खातेवाटप येत्या सर्वसाधारण सभेत केले जाणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सोमवारी चार विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी १० वाजेपासून प्रारंभ करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस आघाडी समर्थित राष्ट्रवादीच्या समाज कल्याण सभापतीपदाचे उमेदवार सुशीला कुकडे यांनी ३३ मते प्राप्त करून विजय मिळविला. त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे दिनेश टेकाम यांचा ६ मतांनी पराभव केला. टेकाम यांना २६ मते मिळालीत. महिला व बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत काँगेसच्या वनिता पाल यांनीही ३३ मते प्राप्त करून भाजप समर्थित राष्ट्रवादीच्या सीमा घाडगे यांचा ६ मतांनी पराभव केला. दोन विषय सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे जयंत देशमुख यांना ३३ तर भाजपा समर्थित लढा संघटनेच्या गौरी देशमुख यांना २६ मिळालीत. दुसऱ्या विषय समिती सभापतीपदासाठी काँग्रेस युतीचे रिपाइंचे उमेदवार बळवंत वानखडे यांनाही ३३ मते मिळालीत. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या शिल्पा भलावी यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत तटस्थ भूमिका बजाविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी मात्र सभापती पदासाठीच्या निवडणूक काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या बाजूने मतदान केले. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेत ५९ सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, सहायक अधिकारी तहसीलदार अनिरूध्द बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रमोद देशमुख, प्रकाश माहुरे, नवनाथ तायडे, विजय शेलूकर, नीलेश तालन, झेडपीचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांनी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली.झेडपीचे तख्त यापूर्वी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने विषय समिती सभापती पदासाठी पडद्यामागे राजकीय हालचाली चालविल्या होत्या. मात्र, काँग्रेस प्रारंभीपासूनच सावध पावले टाकीत असल्याने भाजपला कोणतीही राजकीय संधी देण्यास वाव मिळाला नाही. परंतु राज्यात भाजपची सत्ता असल्याने काही तरी वेगळी राजकीय खेळी होईल, ही ंिचंता काँग्रेसच्या नेत्यांना अगोदरपासून होती. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटपर्यत संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र सभागृहात अनुभवता आले. मात्र, काँग्रेसने ‘नहेले पे दहेला’ ही राजकीय खेळी करून भाजप व मित्रपक्षाला कोणतेही पद वाट्याल्या येऊ दिली नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. सभापती पदाच्या निवडणूकीत दगा फटका होऊ नये यासाठी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, माजी आ. संजय बंड, केवलराम काळे, रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह नेते लक्ष ठेवून होते.