शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:29 IST

टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेलापाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.यावर्षी अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भीषण आहे. ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसहीपाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आता ही परिस्थिती भयावह झाली आहे. झेडपीचे अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबतच वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागले आहे. पदाधिकारी कार्यालयात हजर असताना संबंधित परिचराकडून पिण्यासाठी बाहेरील पाणेरीवरून बॉटल बोलवतात. प्रसाधनगृहात वापरण्यासाठीही बाहेरून पाणी आणावे लागत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कुलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे. एका पदाधिकाºयांच्या दालनात प्रसाधनगृहासमोर तर 'प्रसाधनगृहाचा वापर करण्यापूर्वी कृपया पाणी असल्याची खात्री करावी' अशी सूचनाच लिहिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे निवारण करणाºया जिल्हा परिषदेतील पाणी टंचाई केव्हा दूर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेत पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्यात. मात्र आचारसंहिता व अन्य कारणांमुळे लक्ष दिले नाही. त्यामुळेच झेडपीत पाण्याची कुत्रिम टंचाई आहे. ती तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष, जिल्हा परिषदजिल्हा परिषदेत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोअर करण्यात आले. मात्र त्यातील उद्भव कमी आहे. त्यामुळे लवकरच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील.- मनीषा खत्री,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :water shortageपाणीटंचाईzpजिल्हा परिषद