शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर ?

By admin | Updated: December 18, 2015 00:29 IST

गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे.

३०८ शाळा बंदच्या मार्गावर : जिल्ह्यात जि.प.च्या १६०१ शाळाअमरावती : गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच घसरण असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावत चाललेली पटसंख्या चितेंची बाब ठरली आहे. जिल्ह्यातील ३०८ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. कमी पटसंख्येच्या या शाळा बंद होण्याचीही शक्यता असून तसे झाल्यास या शाळांतील शिक्षकांना नाईलाजाने दुसऱ्या शाळेची वाट धरावी लागणार आहे.ज्या शाळांची पटसंख्याअरयंत कमी आहे.त्या बंद करण्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत खुलासा केला आहे. शिक्षकांचे वेतन सुरू असल्यामुळे अशा अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी शासन हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०१ शाळा आहेत. त्यामधील ३०८ शाळा २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती तालुक्याकत ४६ आणि सर्वात कमी शाळा महापालिका क्षेत्रात ४ आहेत. यासह इतर तालुक्यात वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. त्यामुळे या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी असे झाल्यास जिल्हा परिषदेचे ेजवळपास ८०० शिक्षकांचेही समायोजन शिक्षण विभागाला करावे लागणार आहे.