शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

‘कृषी’च्या योजनांसाठी जिल्हा परिषद सरसावली

By admin | Updated: December 13, 2014 22:31 IST

शेतीशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग केल्याने जिल्हा परिषदेचा कृषी विभाग कमकुवत झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या प्रमुख योजना पुन्हा

जितेंद्र दखने - अमरावतीशेतीशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग केल्याने जिल्हा परिषदेचा कृषी विभाग कमकुवत झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या प्रमुख योजना पुन्हा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदांनी कंबर कसली आहे. याबाबत चर्चा करुन मते जाणून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील कृषी सभापतीची शिर्डीला १४ डिसेंबर रोजी परिषद पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना भेटून सभापतीचे शिष्टमंडळ या योजना जिल्हा परिषदेकडे देण्याचा मुद्दा रेटणार आहेत. कृषी योजनांचा जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागामार्फत लाभ दिला जायचा. १९८६ पासून जिल्हा परिषदेकडे असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना हळूहळू कमी करत बहुतांश योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. आता फक्त मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी असलेल्या विशेष घटक योजनाच जिल्हा परिषदेकडे आहे. ग्रामीण भागात राज्य शासनाच्या कृषी विभागापेक्षा जिल्हा परिषदेचा अधिक संपर्क असतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीशी थेट संबंध असल्याने योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होत होती. ७३व्या घटनादुरुस्ती नुसार या योजना जिल्हा परिषदेने राबवायचा कायदा असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी विभागाच्या योजना पुन्हा परत मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदांनी एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाकडे वर्ग केलेल्या कृषी योजना पुन्हा परत मिळविण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद कृषी सभापतींची याबाबत मते जाणून घेण्याकरिता शिर्डी येथे १४ डिसेंबर रोजी परिषद होत आहे.