शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

झेडपीच्या तिजोरीत ५० कोटींचा निधी

By admin | Updated: December 22, 2015 00:12 IST

शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

वाटप खोळंबले : ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षाअमरावती : शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असला तरी याचे वाटप मार्गदर्शक सूचनांच्या कात्रित अडकले आहे. मार्गदर्शक सूचना झाल्यानंतर ग्रामपंचायतींना त्याचे वाटप होणार आहे. १४व्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने महाराष्ट्राला साधारणपणे साडेपाच हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. त्याचा पहिला हप्ता राज्याला प्राप्त झाला असून त्याचे वाटप करण्यात आले आहे. यातून अमरावती जिल्हा परिषदेच्या वाट्याला ५० कोटी रुपये प्राप्त झाले. पूर्वी हा निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेला होते. त्यामुळे ज्याची सत्ता असते किंवा पदावरील व्यक्ती आपल्या मतदारसंघातील कामांना प्राधान्य देत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी कामे झाली आहेत. अशाच ठिकाणी पुन्हा कामे सुचविण्याचे प्रकार घडू लागले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने निधी वाटपाचे निकष बदलले. जिल्हा परिषदेचे अधिकार काढून घेण्यात आले. लोकसंख्यानिहाय व गावाच्या क्षेत्रफळावर आधारित ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना फारसा हस्तक्षेप करता येणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीबाबतही अशीच ओरड असल्याने पूर्वी एकत्रित निधी जिल्हा परिषदेला मिळत होता. पण आता जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून ज्या सदस्यांची नियोजन मंडळावर निवड झाली आहे त्यांना निधी दिला जातो. त्यामुळे या ठिकाणीही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. १४व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचे वाटप करताना लोकसंख्येचा आणि गावाच्या क्षेत्रफळाचा विचार करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या निधीतून लोकसंख्येनुसार ९० टक्के रक्कम आणि क्षेत्रफळानुसार १० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)