शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या तिजोरीत ५० कोटींचा निधी

By admin | Updated: December 22, 2015 00:12 IST

शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

वाटप खोळंबले : ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षाअमरावती : शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असला तरी याचे वाटप मार्गदर्शक सूचनांच्या कात्रित अडकले आहे. मार्गदर्शक सूचना झाल्यानंतर ग्रामपंचायतींना त्याचे वाटप होणार आहे. १४व्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने महाराष्ट्राला साधारणपणे साडेपाच हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. त्याचा पहिला हप्ता राज्याला प्राप्त झाला असून त्याचे वाटप करण्यात आले आहे. यातून अमरावती जिल्हा परिषदेच्या वाट्याला ५० कोटी रुपये प्राप्त झाले. पूर्वी हा निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेला होते. त्यामुळे ज्याची सत्ता असते किंवा पदावरील व्यक्ती आपल्या मतदारसंघातील कामांना प्राधान्य देत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी कामे झाली आहेत. अशाच ठिकाणी पुन्हा कामे सुचविण्याचे प्रकार घडू लागले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने निधी वाटपाचे निकष बदलले. जिल्हा परिषदेचे अधिकार काढून घेण्यात आले. लोकसंख्यानिहाय व गावाच्या क्षेत्रफळावर आधारित ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना फारसा हस्तक्षेप करता येणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीबाबतही अशीच ओरड असल्याने पूर्वी एकत्रित निधी जिल्हा परिषदेला मिळत होता. पण आता जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून ज्या सदस्यांची नियोजन मंडळावर निवड झाली आहे त्यांना निधी दिला जातो. त्यामुळे या ठिकाणीही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. १४व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचे वाटप करताना लोकसंख्येचा आणि गावाच्या क्षेत्रफळाचा विचार करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या निधीतून लोकसंख्येनुसार ९० टक्के रक्कम आणि क्षेत्रफळानुसार १० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)