शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

नववी ते बारावीपर्यंतच्या २५० शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST

अमरावती : राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये २३ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. मात्र, २० दिवसांनंतरही शाळांना ...

अमरावती : राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये २३ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. मात्र, २० दिवसांनंतरही शाळांना विद्यार्थी, पालकांचा फारसा प्रतिसाद नाही. अद्यापपर्यंत शून्य उपस्थितीची नोंद, जिल्ह्यात ५४८ पैकी २५० शाळांमध्ये शून्य उपस्थिती असल्याचे वास्तव चित्र आहे.

शासन आदेशाप्रमाणे शासकीय, खासगी, निमशासकीय शाळांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले. कोरोना नियमावलींचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू केल्यात. गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमांचे धडे विद्यार्थ्यांना घेता यावे, यासाठी दिवसाआड वर्ग शिकवणींना प्राधान्य देण्यात आले. विषयनिहाय शिक्षकांचे नियोजनदेखील शाळा संचालक, मुख्याध्यापकामार्फत करण्यात आले. परंतु, पालक मुलांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नसल्याचे वास्तव शिक्षण विभागाच्या फिरत्या पथकाने शाळांवर भेटी दिल्या असता दिसून आले. बहुतांश पालकांना कोरोना लसीनंतरच शाळेत मुलांना पाठवू, अशी मनाची तयारी केली आहे. एवढेच नव्हे तर अमरावती महानगरातील विद्यार्थी संख्येने अधिक असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे शाळेत ऑफलाईन शिक्षणास नकार दिला जात आहे. २० दिवस ओलांडुनही शाळांमध्ये गर्दी नसल्याचे चित्र आहे.

------------------------------------

शिक्षकांमध्ये कोरोनाची भीती

कोरोना संसर्ग ओसरत चालला असताना शिक्षकांमध्ये कमालीची भीती दिसून येत आहे. स्थानिक काही शाळांमध्ये शिक्षक शिकवणीचे तर दूरच कागदालाही हात लावत नाही. पालक, विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबत असलेली भीती दूर करण्याऐवजी शिक्षकांचे असे वागणे बघून बहुतांश पालकांनी शाळांमध्ये मुलांना अध्ययनास पाठविण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

-------------------------

जिल्ह्यात ५४८ शाळांपैकी २५० शाळांमध्ये २० दिवसांत एकही विद्यार्थी आले नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातही कोरोना संसर्गाची भीती आहे. ग्रामीणमध्ये तरी १०, २० विद्यार्थी येत असून, शहरातील शाळांचा ऑनलाईन शिक्षणावर भर आहे.

- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, अमरावती.

--------------------

शिक्षणापेक्षा मुलांचा जीव महत्त्वाचा आहे. अद्यापही कोरोना गेला नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे पालक म्हणून कर्तव्य आहे. नवीन वर्षात कोरोना लस आल्यानंतर मुलांना शाळेत पाठवू.

- संध्या खांडेकर, पालक, अमरावती