शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

टोळधाडीने नुकसान भरपाईसाठी झेडपीत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा : शासनाकडून मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनासोबतच टोळधाडीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. टोळधाडीमुळे होणाºया नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, अशा आशयाचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सदर मुद्दा सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सभेत मांडला होता. हा ठराव आता शासनाकडे पाठविला जाणार आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी २९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी केली होती. यादरम्यान जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्याने शासनाकडून त्याची तरतूद करावी, अशा सूचना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्या.दरम्यान, आमसभेत बहुरूपी यांच्या मुद्द्याच्या अनुषंगाने टोळधाडीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी शासनाकडे या ठरावाद्वारे केली आहे.पशुधन विमा, विद्यार्थ्यांना सॅनिटायझर पुरवातीन महिन्यांत जिल्ह्यात जनावरे चोरी होण्याच्या एकूण १२ घटना घडल्या आहेत. त्यामुळे पशुधनाचा खासगी विमा काढावा. आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील १ हजार ६०० शाळांतील १ लाख १० हजारांवर विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोव्ह्ज उपलब्ध करून द्यावे तसेच पशुसंवर्धन विभागाकडून सुमार दर्जाचा औषध पुरवठा त्वरित बंद करून चांगल्या दर्जाचे औषधे उपलब्ध करून देण्यात यावे आदी मुद्दे सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडले. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पशुधनाच्या विम्याकरिता ठराव करून तो शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सभागृहात सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत सॅनिटायझर, मास्क, हॅँडग्लोव्ह्ज पुरवठ्याकरिता निधी देण्याबाबतचा ठराव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेती