शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांना झेडपी देणार समज

By admin | Updated: August 27, 2016 00:02 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या महत्त्वाच्या सभेची नोटीस दिल्यावरही विभागाचे अधिकारी नेहमी गैरहजर राहतात. ...

सदस्य आक्रमक : जलव्यवस्थापन, स्थायी समितीचा निर्णय अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विषय समितीच्या महत्त्वाच्या सभेची नोटीस दिल्यावरही विभागाचे अधिकारी नेहमी गैरहजर राहतात. हा प्रकार नित्याचाच झाल्याने शुक्रवारी जलव्यवस्थापन समिती सभेत व त्यानंतर स्थायी समितीच्या सभेत या मुद्यावर सदस्यांनी आक्षेप घेऊन अशा अधिकाऱ्यांना ताकिदपत्र देण्याची मागणी सभागृहात रेटून धरली. अखेर सभेचे सचिव डेप्युटी सीईओंनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे आश्वासन सदस्यांना दिलेत.२६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष तथा सभापती सतीश उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सभेत माजी अध्यक्ष तथा सदस्य सुरेखा ठाकरे यांनी जलव्यवस्थापन, स्थायी समिती, आणि सर्वसाधारण सभा महत्त्वाच्या आहेत. मात्र बरेच वेळा या सभेला झेडपीतील काही अधिकारी शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी पत्र पाठवूनही सभेला हजर राहत नाहीत. ही बाब गंभीर आहे. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता. प्रशासनामार्फत उपस्थित व गैरहजर अधिकाऱ्यांची माहिती घेतली. यावेळी वरिष्ठ भूजल सर्वेक्षण विभाग, राज्य परिवहन, कार्यकारी अभियंता पाटबंधारे लघुसिंचन विभाग, वनविभाग, कार्यकारी अभियंता उर्ध्ववर्धा आदी विभागाचे अधिकारी गैरहजर आढळून आलेत. याशिवाय स्थायी समितीतही गैरहजर अधिकाऱ्यांचा मुद्दा अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे, बबलू देशमुख, सुधीर सूर्यवंशी यांनी उपस्थित केला. त्यामुळे दोन्ही समितीच्या सदस्यांच्या मागणीची दखल घेत सभेला गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना झेडपीच्यावतीने पत्राव्दारे समज देण्यात येईल, असे सीईओ किरण कुलकर्णी यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान जलव्यवस्थापन समितीत मेळघाटील पाणीपुरवठा योजना केवळ वीज जोडणीअभावी बंद पडल्याचा मुद्दा सदस्य सदाशिव खडके यांनी उपस्थित केला. त्यानुसार धारणीचे उपअभियंता यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतरही वीज जोडणीअभावी मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकला नसल्याचे वास्तव सभागृहात मांडले. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता एन. बी. गावंडे यांनी याबाबत तातडीने कारवाई केली जात असल्याचे सांगितले. यावेळी सभेला अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरू णा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्य सुरेखा ठाकरे, महेंद्रसिंग गैलवार, बापुराव गायकवाड, सदाशिव खडके,ज्योती आरेकर, करूणा गावंडे सीईओ किरण कुलकर्णी, ङेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, संजय इंगळे, सिंचनचे कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, पाणी पुरवठयाचे के.टी. उमाळकर, कृ षी विभागाचे अधिक्षक अधिकारी दत्तात्रय मुळे आनंद दासवत, प्रदिप ढेरे, संजय येवले व अन्य अधिकारी उपस्थित होते.खडीमल तलाव दुरूस्तीचा ठरावमेळघाटातील चिखलदरा तालुक्यात खडीमल या गावातील सिंचन तलाव नादुरूस्त असल्याने यात जलसंचय होत नाही. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या गावातील पाणी टंचाईची समस्या दुर होऊ शकत नाही असा मुद्दा सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी मांडला. हा ठराव एकमताने मान्य केला आहे.(प्रतिनिधी)पीक विम्याचा मुद्दा गाजलाकृषी विभागाचे वतीने काढण्यात आलेल्या पीक विम्यात सोयाबीन पिकांचे चांदूरबाजार तालुक्यात अधिक नुकसान झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यात उंबरठा पद्धतीने लावलेले निकष व सर्वेक्षणात या तालुक्याचे नुकसान कमी कसे येऊ शकते, असा प्रश्न सभेत सुरेखा ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान या मुद्दावर कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी पीक विमा कंपनीकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष संवादही साधला. मात्र यावर कुठलेही उत्तर अद्याप प्राप्त झाले नाही. यासंदर्भात तातडीने योग्य कारवाई करण्यात येईल व त्याबाबत सदस्यांना माहिती देण्याचे मुळे यांनी मान्य केले.