शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

शेतकरी कर्जमुक्तीसाठी युवा स्वाभिमानचा पुढाकार

By admin | Updated: June 6, 2017 00:09 IST

आमदार रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : बळीराजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार रवी राणांद्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पांठिबा जाहीर करून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. काहीही करा, बळीराजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढा, अशी आर्त हाक देण्यात आली.जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली असून ती त्वरेने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, तूर खरेदीच्या मोबदल्याची रक्कम दोन दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मिळावी, शेतकऱ्यांना बी-बियाणे वेळेवर देण्यात यावे, बोगस बियाणे विकले जाणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी, सततच्या नापिकीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी बँकांनी पीककर्ज उभारून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, जि.प. सदस्य मयुरी कावरे, दिनेश टेकाम, प्रदीप थोरात, जया तेलखंडे, रश्मी घुले, मीना डकरे उपस्थित होते.