शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अमरावतीमधील लायब्ररी चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून; जुन्या वादाचा वचपा

By प्रदीप भाकरे | Updated: May 11, 2023 18:40 IST

Amravati News पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली.

अमरावती : पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. निखिल ऊर्फ बाबू राजेश तिरथकर (२४, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा) असे मृतकाचे नाव आहे. मृतक तरुणाने सहा महिन्यांपूर्वी मुख्य मारेकऱ्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. त्याचा वचपा म्हणून निखिलचा खून झाल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.

             फ्रेजरपुरा पोलिसांनुसार, देवा रामअधार जयस्वाल (२६) असे मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह विजय किसनलाल मंडले (३९), शक्ती प्रवीण वाघमारे (२७), करण श्याम मंडले (२४), विशाल पवन मंडले (२३) आणि शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा. फ्रेजरपुरा) या सहा जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत अटक केली. निखिल तिरथकर याने ऑक्टोबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान भावावर चाकूने वार करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी निखिल तिरथकरविरुद्ध फ्रेजरपुरा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळीपासून देवा जयस्वाल आणि निखिल तिरथकर यांच्यात एकमेकांना पाहण्याची ‘खुन्नस’ होती. 

पोलिसांनी वाद शमवलाबुधवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा परिसरात शक्ती वाघमारेचा त्याच्या घरालगत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण चांगलेच वाढले होते. दरम्यान, या वादात निखिल तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच हा वाद झाल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा चौकात पोहोचला होता. पोलिसांनी भांडण करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखिल हे सुद्धा आपापल्या घराकडे निघून गेले.

पोलिस होते चौकात, गल्लीत झाला गेम

दरम्यान, त्याचवेळी सुमारे निखिल तिरथकर हा लायब्ररी चौका नजीकच्या एका गल्लीत गेला असता देवा जयस्वाल, शक्ती वाघमारे व इतर चौघे अशा सहा जणांनी मिळून निखिलला अडवले. त्यावेळी देवा जयस्वालने निखिलच्या दोन्ही मांड्यांवर चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी पसार झाले. त्याचवेळी चौकात असलेल्या पोलिसांनी गल्लीत धाव घेतली. त्याला तत्काळ पोलिस वाहनातून इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेहाल मुकेश तिरथकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी