शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बॅनरवरील मोदी नावावर ‘भारत’ असे स्टीकर चिकटवून युवक काँग्रेसचे आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: February 5, 2024 19:12 IST

केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ असे अपेक्षित आहे.

अमरावती: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील केंद्र सरकारच्या योजनेच्या जाहिरातीवर खासगी असा उल्लेख असल्याने सोमवारी स्थानिक युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारत असे स्टीकर चिकटवून सरकारचा निषेध केला. त्यामुळे केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना या केंद्र सरकारच्या योजना आहेत, कोणत्याही व्यक्तीच्या नाहीत. परंतु, सर्वसामान्यांच्या पैशातून स्वत:चा प्रचार करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ असे अपेक्षित आहे. मात्र, खासगी नावे छापण्यात आली असून, ही संविधान विरोधी कृती असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक योजनेच्या बॅनरवर भारत सरकार असे नाव करावे, अशी मागणी युवक काँग्रेसने वारंवार करूनही केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागपूर येथे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी बॅनरवर भारत सरकार असे स्टीकर चिकटवून काळे फासून आंदोलन केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या निषेधार्थ अमरावतीतही युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीवर लावण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भातील बॅनरवरील भारत असे स्टीकर चिकटवत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी नीलेश गुहे, वैभव देशमुख, पंकज मांदळे, शुभम बांबल, अभिजित मेश्राम, अमय देशमुख, अमित गुडधे, वेदांत साखरे, अमोल राऊत, आदी या आंदोलनात सहभागी होते.

टॅग्स :Amravatiअमरावतीcongressकाँग्रेस