शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या वाहनांना १० ते १५ वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आरटीओकडून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, आता नोंदणी नसलेल्या अनेक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंगार वाहनांतून जीवघेणा प्रवास सुरू असला तरी सांगू कुणाला, असा सवाल प्रवाशांचा आहे.आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात. तरीही प्रवासी वाहने विनाफिटनेस, विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत. एसटीचा पूर्णपणे संप अद्यापही मिटला नाही.  त्यामुळे नागरिकांची गोची होत असून, खासगी प्रवासी वाहनांशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. स्थानिक मध्यवर्ती आगार परिसरातून तसेच पंचवटी चाैकातून खासगी प्रवासी वाहने सुसाट धावतात. यात अनेक भंगार वाहनांचाही समावेश असतो. अशा वाहनांवर नियमाने कारवाई व्हायला हवी. 

या वाहनांशिवाय पर्याय नाहीबस बंद असल्यामुळे नागपूरला जायचे असल्यास लक्झरी बस तसेच परतवाडा, दर्यापूर, चांदूररेल्वे, मोर्शी व इतर तालुक्यात जाण्यासाठी काळी पिवळी, स्कूल बस तसेच इतर अनेक खासगी वाहने धावत आहेत. प्रवासी अधिक असल्याने भंगार वाहनेही रस्त्यावर काढली आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा नागरिकांना खासगी प्रवासी वाहनाशिवाय पर्याय नाही.

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोकाएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सर्व खासगी वाहने रस्त्यावर उतरली असून प्रवासी भाडे घेत आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत भाडे दीडपट ते दुप्पट केले आहे. असे असतानाही अनेक भंगार अवस्थेत असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाचे आयुष्य संपल्यानंतरही आरटीकडे नोंदणी नूतनीकरण न करता वाहने धावत असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.

नियमानुसर ज्या प्रवासी वाहनांचे आयुष्य ८ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. अश्या वाहनांना दरवर्षी फिटनेस करून पासिंग करुन घ्यावी लागते. विना पुर्ननोंदणी न करता वाहने धावत असतील तर अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तशी वर्षभरही कारवाई करण्यासंदर्भातील मोहिम सुरुच असते. मोटर वाहन चालकांना आदेशित करून पुन्हा मोहिम राबविण्यात येईल.-रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस