शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या वाहनांना १० ते १५ वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आरटीओकडून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, आता नोंदणी नसलेल्या अनेक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंगार वाहनांतून जीवघेणा प्रवास सुरू असला तरी सांगू कुणाला, असा सवाल प्रवाशांचा आहे.आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात. तरीही प्रवासी वाहने विनाफिटनेस, विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत. एसटीचा पूर्णपणे संप अद्यापही मिटला नाही.  त्यामुळे नागरिकांची गोची होत असून, खासगी प्रवासी वाहनांशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. स्थानिक मध्यवर्ती आगार परिसरातून तसेच पंचवटी चाैकातून खासगी प्रवासी वाहने सुसाट धावतात. यात अनेक भंगार वाहनांचाही समावेश असतो. अशा वाहनांवर नियमाने कारवाई व्हायला हवी. 

या वाहनांशिवाय पर्याय नाहीबस बंद असल्यामुळे नागपूरला जायचे असल्यास लक्झरी बस तसेच परतवाडा, दर्यापूर, चांदूररेल्वे, मोर्शी व इतर तालुक्यात जाण्यासाठी काळी पिवळी, स्कूल बस तसेच इतर अनेक खासगी वाहने धावत आहेत. प्रवासी अधिक असल्याने भंगार वाहनेही रस्त्यावर काढली आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा नागरिकांना खासगी प्रवासी वाहनाशिवाय पर्याय नाही.

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोकाएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सर्व खासगी वाहने रस्त्यावर उतरली असून प्रवासी भाडे घेत आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत भाडे दीडपट ते दुप्पट केले आहे. असे असतानाही अनेक भंगार अवस्थेत असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाचे आयुष्य संपल्यानंतरही आरटीकडे नोंदणी नूतनीकरण न करता वाहने धावत असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.

नियमानुसर ज्या प्रवासी वाहनांचे आयुष्य ८ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. अश्या वाहनांना दरवर्षी फिटनेस करून पासिंग करुन घ्यावी लागते. विना पुर्ननोंदणी न करता वाहने धावत असतील तर अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तशी वर्षभरही कारवाई करण्यासंदर्भातील मोहिम सुरुच असते. मोटर वाहन चालकांना आदेशित करून पुन्हा मोहिम राबविण्यात येईल.-रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस