शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

भंगार वाहनांतून करावा लागतो प्रवास, सांगू कोणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात.

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या वाहनांना १० ते १५ वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आरटीओकडून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र, आता नोंदणी नसलेल्या अनेक वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भंगार वाहनांतून जीवघेणा प्रवास सुरू असला तरी सांगू कुणाला, असा सवाल प्रवाशांचा आहे.आरटीओकडे १० वर्षांवरील ३०,५७० व्यावसायिक वाहनांची नोंदणी आहे. १५ वर्षांवरील खासगी वाहनांची संख्या ही २ लाख १० हजार ८९६ आहे. आरटीओकडे एकूण नोंदणीकृत ८ लाख १२ हजार ७४४ वाहने आहेत. प्रवासी वाहनांना आठ वर्षे झाले की, दरवर्षी त्या वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र तसेच पासिंग करून घ्यावे लागतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वाहनांची मुदत संपली, ती वाहने रोटेशन पद्धतीने वाहनांचे फिटनेस करून घेतात. तरीही प्रवासी वाहने विनाफिटनेस, विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. आरटीओने अशा वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहेत. एसटीचा पूर्णपणे संप अद्यापही मिटला नाही.  त्यामुळे नागरिकांची गोची होत असून, खासगी प्रवासी वाहनांशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. स्थानिक मध्यवर्ती आगार परिसरातून तसेच पंचवटी चाैकातून खासगी प्रवासी वाहने सुसाट धावतात. यात अनेक भंगार वाहनांचाही समावेश असतो. अशा वाहनांवर नियमाने कारवाई व्हायला हवी. 

या वाहनांशिवाय पर्याय नाहीबस बंद असल्यामुळे नागपूरला जायचे असल्यास लक्झरी बस तसेच परतवाडा, दर्यापूर, चांदूररेल्वे, मोर्शी व इतर तालुक्यात जाण्यासाठी काळी पिवळी, स्कूल बस तसेच इतर अनेक खासगी वाहने धावत आहेत. प्रवासी अधिक असल्याने भंगार वाहनेही रस्त्यावर काढली आहेत. ज्यांच्याकडे दुचाकी नाही, अशा नागरिकांना खासगी प्रवासी वाहनाशिवाय पर्याय नाही.

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोकाएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सर्व खासगी वाहने रस्त्यावर उतरली असून प्रवासी भाडे घेत आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत भाडे दीडपट ते दुप्पट केले आहे. असे असतानाही अनेक भंगार अवस्थेत असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाचे आयुष्य संपल्यानंतरही आरटीकडे नोंदणी नूतनीकरण न करता वाहने धावत असल्याने कारवाईची अपेक्षा आहे.

नियमानुसर ज्या प्रवासी वाहनांचे आयुष्य ८ वर्षापेक्षा जास्त झाले आहे. अश्या वाहनांना दरवर्षी फिटनेस करून पासिंग करुन घ्यावी लागते. विना पुर्ननोंदणी न करता वाहने धावत असतील तर अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. तशी वर्षभरही कारवाई करण्यासंदर्भातील मोहिम सुरुच असते. मोटर वाहन चालकांना आदेशित करून पुन्हा मोहिम राबविण्यात येईल.-रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस