शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघाला नाही : पावसाने आणले डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : मोठ्या कष्टाने व काळजीने चार महिन्यांपासून जोपासत असलेल्या सोयाबीन या नगदी पिकाने याही वर्षी सरासरी न साधल्याने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाची एकरी दोन क्विंटल एवढीच सरासरी लागत असून, लागवडीचा खर्चही यामुळे निघाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या गंज्या पावसाने भिजल्याने होते नव्हते सोयाबीनही खराब झाले. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन, उडीद, मूग हे नगदी पीक समजले जात असल्याने याच पिकांवर शेतकºयांची दिवाळी साजरी होत होती. परंतु या नगदी पिकाने अपेक्षा भंग केल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीनसह सर्वच पिके चांगली होती. परंतु सततच्या पावसाने सुरुवातीला उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांच्यावर नुकसान झाले, त्याचा सर्व्हेही झाल्याचे शासनाने सांगितले. परंतु आता त्याची प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पिकानंतर कापूस आणि तूर या पिकांवर उर्वरित शेतकºयांच्या अपेक्षा लागून आहेत.विम्याची रक्कम त्वरित मिळावीनगदी पैसे भरून विमा काढला. पीक वाया गेले. सोयोबीनची सरासरी पाहता अनेकांनी सोयाबीन काढलेच नाही. शासनाने सरसकट मदत तर केलीच पाहिजे, शिवाय सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कमही त्वरित मिळावी, यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा