शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
7
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
8
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
9
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
10
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
11
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
12
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
13
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
14
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
15
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
16
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
17
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
18
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
19
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
20
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघाला नाही : पावसाने आणले डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : मोठ्या कष्टाने व काळजीने चार महिन्यांपासून जोपासत असलेल्या सोयाबीन या नगदी पिकाने याही वर्षी सरासरी न साधल्याने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाची एकरी दोन क्विंटल एवढीच सरासरी लागत असून, लागवडीचा खर्चही यामुळे निघाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या गंज्या पावसाने भिजल्याने होते नव्हते सोयाबीनही खराब झाले. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन, उडीद, मूग हे नगदी पीक समजले जात असल्याने याच पिकांवर शेतकºयांची दिवाळी साजरी होत होती. परंतु या नगदी पिकाने अपेक्षा भंग केल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीनसह सर्वच पिके चांगली होती. परंतु सततच्या पावसाने सुरुवातीला उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांच्यावर नुकसान झाले, त्याचा सर्व्हेही झाल्याचे शासनाने सांगितले. परंतु आता त्याची प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पिकानंतर कापूस आणि तूर या पिकांवर उर्वरित शेतकºयांच्या अपेक्षा लागून आहेत.विम्याची रक्कम त्वरित मिळावीनगदी पैसे भरून विमा काढला. पीक वाया गेले. सोयोबीनची सरासरी पाहता अनेकांनी सोयाबीन काढलेच नाही. शासनाने सरसकट मदत तर केलीच पाहिजे, शिवाय सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कमही त्वरित मिळावी, यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा