शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सोयाबीनचे उत्पन्न एकरी दोन क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघाला नाही : पावसाने आणले डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : मोठ्या कष्टाने व काळजीने चार महिन्यांपासून जोपासत असलेल्या सोयाबीन या नगदी पिकाने याही वर्षी सरासरी न साधल्याने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तालुक्यात सोयाबीन उत्पादनाची एकरी दोन क्विंटल एवढीच सरासरी लागत असून, लागवडीचा खर्चही यामुळे निघाला नसल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात रोटावेटर फिरविण्याचाही निर्णय घेतला आहे, तर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या गंज्या पावसाने भिजल्याने होते नव्हते सोयाबीनही खराब झाले. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळाला नाही. सोयाबीन, उडीद, मूग हे नगदी पीक समजले जात असल्याने याच पिकांवर शेतकºयांची दिवाळी साजरी होत होती. परंतु या नगदी पिकाने अपेक्षा भंग केल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीनसह सर्वच पिके चांगली होती. परंतु सततच्या पावसाने सुरुवातीला उडीद, मूग या पिकांसह सोयाबीन पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तालुक्यात सरासरी ७० टक्क्यांच्यावर नुकसान झाले, त्याचा सर्व्हेही झाल्याचे शासनाने सांगितले. परंतु आता त्याची प्रत्यक्षात मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दुसरीकडे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या पिकानंतर कापूस आणि तूर या पिकांवर उर्वरित शेतकºयांच्या अपेक्षा लागून आहेत.विम्याची रक्कम त्वरित मिळावीनगदी पैसे भरून विमा काढला. पीक वाया गेले. सोयोबीनची सरासरी पाहता अनेकांनी सोयाबीन काढलेच नाही. शासनाने सरसकट मदत तर केलीच पाहिजे, शिवाय सोयाबीन व इतर पिकांच्या विम्याची रक्कमही त्वरित मिळावी, यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा