शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तिसरीच्या विद्यार्थिनीला येईना नऊचा पाढा!

By admin | Updated: November 19, 2016 00:11 IST

प्राथमिक शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. शिक्षकांच्या वेतनावर दरमहा महापालिकेची तिजोरी रिती होती.

गुणवत्तेचा बट्ट्याबोळ : रुख्मिणीनगर शाळेचे वास्तव, दर्जा सुधारणार कसा?प्रदीप भाकरे अमरावतीप्राथमिक शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. शिक्षकांच्या वेतनावर दरमहा महापालिकेची तिजोरी रिती होती. मात्र, शिक्षणासाठी खर्चाची साध्यता होत नसल्याचे भीषण वास्तव आहे. गुरूवारी रूख्मिणीनगर शाळा क्र.१९ मध्ये उपस्थित चारपैकी तिसरीतील विद्यार्थीनीने चक्क ‘नऊ सकं पंचेचाळीस’ असे सांगितले. हे उत्तर महापालिका शाळांचा दर्जा किती सुमार झालाय, याचे प्रतिनिधिक उत्तर ठरले आहे. आ. सुनील देशमुख यांनी रूख्मिणीनगर क्र. १९ ही महापालिकेची शाळा दत्तक घेतली आहे. याशाळेचा खालावलेला दर्जा सुधारावा, शाळेला उर्जितावस्था यावी, यासाठी याशाळेचे आमदार निधीतून १५ ते २० लाख रूपयांची आर्थिक मदत केली. मात्र, शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या बाह्यदर्शनी भागाची रंगरंगोटी आणि अग्रभागावर टाईल्स लाऊन भौतिक सुविधेला अग्रक्रम दिला गेला आहे. प्रत्यक्षात विद्यार्थीसंख्या आणि दर्जाबाबत कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. महापालिकेची कोट्यवधी रूपयांची ही मालमत्ता विद्यार्थ्यांविना ओस पडून आहे.आ. सुनील देशमुख यांनी ही शाळा दत्तक घेतली असली तरी या स्तुत्य उपक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाची आहे. तथापि त्यांनी दुर्लक्ष चालवले आहे.महापालिकांच्या शाळा वाऱ्यावरअमरावती : कायदेशिर अधिकार नसल्याने आणि नवे काही करण्याची उमेद नसल्याने शिक्षण विभाग आणि पर्यायाने महापालिकांच्या शाळा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. शिक्षकांच्या नोकरीसाठी खटाटोप : रूख्मिणीनगर, अंबिकानगर, रामनगर या व अशा २१ ते २५ द्विशिक्षकीय शाळांची अवस्था फारच बिकट आहे. १ ते ५ वर्ग मिळून १५ ते ३० अशी पटावर संख्या आहे. प्रत्यक्षात ती बनावटच आहे. मात्र, शिक्षकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आणि अनुदान मिळविण्यासाठी पटावरचा खेळ सुरू आहे. त्याला प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत आहे. नर्सरी कुलूपबंद देशमुखांच्या या दत्तकशाळेत यंदा प्रथमच इंग्रजी माध्यमातील नर्सरी सुरू करण्यात आली. १३ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र, खेळण्या-बागडण्याच्या वयात कुठलीही सुविधा, खेळणी उपलब्ध नसल्याने ही इंग्रजी नर्सरी पाच महिन्यांपासून कुलूपबंद आहे. अगदी सुरूवातीला येथे विद्यार्थी येत होते. मात्र, विद्यार्थ्यांना नर्सरीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने पालकांनीच आपल्या पाल्याला पाठविणे बंद केल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे सुरूवात होताच अपशकून अशी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेची अवस्था झाली आहे.वराहांचा मुक्तसंचाररुख्मिणीनगर या प्रतिष्ठित वस्तीत आलेल्या या महापालिकेच्या शाळा परिसरामध्ये वराहांचा मुक्तसंचार आहे. मुलांची अत्यल्प पटसंख्या, ३ शिक्षक आणि भलीमोठी इमारत पांढरा हत्ती ठरली आहे. त्यातच वराहांच्या मुक्त संचाराने लहानग्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एखाद्या शाळेमध्ये वराह कसे असू शकतात, याचे उत्तर रुख्मिणीनगर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे नाही.