शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरमध्ये खरीपाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:37 IST

यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

ठळक मुद्देसहा लाख क्विंटल बियाण्यांची गरजकृषी विभागाद्वारा प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यानुसार किमान ५.८० लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. याव्यतिरिक्त २३,३०० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे.अमरावती जिल्ह्यात सात लाख २६ हजार हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात सात लाख १४ हजार, वाशिम जिल्ह्यात चार लाख सहा हजार व यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नऊ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातून एकूण ५ लाख ८० हजार ४५६ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,५५,५३८ क्विंटल, अकोला जिल्ह्यात ८६,२९०, वाशिम जिल्ह्यात एक लाख, अमरावती १,२१,९७० व यवतमाळ जिल्ह्यात १,१५,६१२ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २ लाख ५५ हजार ६७६ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ३१,६८०, अकोला जिल्ह्यात ३५,८६८, वाशिम ५१,७२६, अमरावती ६६,३९० व यवतमाळ जिल्ह्यात ७०,०१२ क्विंटल बियाणे उपलब्ध करणार आहे.बीटीच्या ४६.५० लाख पाकिटांची मागणीयंदाच्या खरिपात ४६ लाख ५० हजार बीटी बियाण्यांची पाकिटे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ८,११,५००, अकोला ६,०५,००० वाशिम १,२६,०००, अमरावती ९३,७,५०० व यवतमाळ जिल्ह्यात २१,७०,००० पाकीटे लागणार आहे. ही सर्व बीजी-२ ची आहेत तर बीजी-१ ची ८,१२३ पाकिटांची मागणी आहे. मागील वर्षी १०,२६,२७१ हेक्टर पेरणी होते त्यातुलनेत यंदा ९,३२,५०० हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे.यंदा ६.६४ लाख मे.टन खतांची मागणीयंदाच्या खरिपासाठी ६,६४,७८५ मे.टन रासायनिक खतांची मागणी आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २,०७,९७३ मे.टन, अकोला १०,७,०००, वाशिम ४४,०००, अमरावती १,४०,००० व यवतमाळ जिल्ह्यात १,६५,८१२ मे.टन खतांचा ामावेश आहे. सर्वाधिक युरीया २,१४,९०९ मे.टन, डीएपी १,१०,६८०, एमओपी ३८,४५३ व एसएसपी ८९,०९५ मे.टन खतांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती