शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

यंदा नैसर्गिक आपत्तीत ५१ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: December 21, 2015 00:10 IST

यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे.

अमरावती विभाग : ९२५ कुटुंब बाधित, ६ हजार ७३४ घरांची पडझड अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये १२ व्यक्तींचा मृत्यू झाला. या मध्ये ७ व्यक्ती हे पुरात वाहून गेले. व ५ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात २ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्ती वजी अंगावर पडून दगावले. यवतमाळ जिल्ह्यात ८ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्तीचा विज पडू मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात ३ व्यक्ती पुरात वाहून गेलेत व ५ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. वाशीम जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला व ६ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. विभागात पुरात वाहून गेल्याने २० व्यक्तींचा मृत्यू झाला. १ दरड कोसळून व ३० व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३ तालुक्यांमधील २७२ गावे व ९२५ कुटुंबे बाधित झालीत. यामध्ये १ हजार ४२५ व्यक्तींचा समावेश आहे. या पैकी १९२ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. ४४ व्यक्ती ह्यात जख्मी झाल्यास. तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले. तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले व १७ हजार १५७ हेक्टर ४४ आर क्षेत्रामधील शेती पिके बाधित झाली. विभागात आपत्तीमुळे ७७ मोठी दुधाळ जनावरे मृत झाली. या पैकी ७० प्रकरणात १९ लाख ५२ हजारची मदत देण्यात आली ५२ लहान दुथाळ जनावरे मृत झाली. यामध्ये ३८ प्रकरणांत १ लाख ८९ हजाराची मदत देण्यात आलेली आहे. ओढकाम ७० जनावरचा आपत्तीमध्ये मृत्यु झाला. या पैकी ४८ प्रकरणात १२ लाख ४८ हजाराची मदत जनावरांच्या मालकांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक घरांची पडझड विभागात यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७३४ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ६४२ घरांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. विभागात ७६ घरे पूर्णत: पडली. या साठी ४ कोटी ५७५ लाखाचे अनुदान देण्यात आलेले आहे. २ हजार ७९२ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये ३०४ प्रकरणांत १३ लाख ९ हजारांचे अनुदान देण्यात आले. ३ हजार ८५९ कच्च्या घरांचे नुकसान झाले. यापैकी २ हजार ४९४ पात्र प्रकरणात १३ लाख ६२ हजारांची मदत देण्यात आलेली आहे. ७ झोपड्या व २५ गोठे बाधित झाले.