शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

यंदा नैसर्गिक आपत्तीचे १९ बळी

By admin | Updated: August 9, 2016 00:14 IST

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.

३१ जनावरे मृत : १,२२३ कुटुंबे बाधित, १२८८ घरांची पडझडअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.यंदाच्या पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येणे, वीज पडणे, अंगावर भिंत पडणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला. या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील ८६ गावे बाधित झालीत. यामध्ये १,२२३ नागरिकांना आपत्तीची झळ पोहोचली. घरात पाणी शिरल्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ६ व्यक्ती गंभीर जखमी झाले तर १,२८८ घरांची पडझड झाली. २० जनावरे पुरात वाहून गेलीत. ८ वीज पडून ठार तर ३ जनावरांचा गोठ्याची भिंत पडून मृत्यू झाला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्याकाठालगतची ३,७२७ हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात पाणी साचल्याने ८ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४६५ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७०३.३ मि.मी. पाऊस पडला. याची १५१.३ एवढी टक्केवारी आहे. सर्व तालुक्यांनी सद्यस्थितीत पावसाची सरासरी पार केली आहे. यंदा ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे.यंदा सुरूवातीच्या काळात पाऊस बेपत्ता होता. नंतरच्या काळात मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला. परिणामी पूरामुळे अनेकांचे बळी गेले. तसेच अनेकांची वित्तीय हानी देखील झाली. परंतु शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)वार्षिक सरासरीच्या ८६.४ टक्के पाऊसजिल्ह्यात वार्षिक ८१४.५ मि. मी. सरासरीच्या तुलनेत दोन महिन्यात आतापर्यंत ७०३.३ मि. मी. पाऊस पडला. यामध्ये मोर्शी १०८.९ टक्के, अचलपूर १०८ टक्के, दर्यापूर १०९ टक्के, अंजनगाव १०१.३ टक्के या तालुक्यात वार्षिक सरासरीईतका पाऊस पडला आहे.