शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

यंदा नैसर्गिक आपत्तीचे १९ बळी

By admin | Updated: August 9, 2016 00:14 IST

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.

३१ जनावरे मृत : १,२२३ कुटुंबे बाधित, १२८८ घरांची पडझडअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.यंदाच्या पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येणे, वीज पडणे, अंगावर भिंत पडणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला. या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील ८६ गावे बाधित झालीत. यामध्ये १,२२३ नागरिकांना आपत्तीची झळ पोहोचली. घरात पाणी शिरल्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ६ व्यक्ती गंभीर जखमी झाले तर १,२८८ घरांची पडझड झाली. २० जनावरे पुरात वाहून गेलीत. ८ वीज पडून ठार तर ३ जनावरांचा गोठ्याची भिंत पडून मृत्यू झाला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्याकाठालगतची ३,७२७ हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात पाणी साचल्याने ८ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी १ जून ते ५ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४६५ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७०३.३ मि.मी. पाऊस पडला. याची १५१.३ एवढी टक्केवारी आहे. सर्व तालुक्यांनी सद्यस्थितीत पावसाची सरासरी पार केली आहे. यंदा ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे.यंदा सुरूवातीच्या काळात पाऊस बेपत्ता होता. नंतरच्या काळात मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला. परिणामी पूरामुळे अनेकांचे बळी गेले. तसेच अनेकांची वित्तीय हानी देखील झाली. परंतु शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)वार्षिक सरासरीच्या ८६.४ टक्के पाऊसजिल्ह्यात वार्षिक ८१४.५ मि. मी. सरासरीच्या तुलनेत दोन महिन्यात आतापर्यंत ७०३.३ मि. मी. पाऊस पडला. यामध्ये मोर्शी १०८.९ टक्के, अचलपूर १०८ टक्के, दर्यापूर १०९ टक्के, अंजनगाव १०१.३ टक्के या तालुक्यात वार्षिक सरासरीईतका पाऊस पडला आहे.