शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ऊन-सावल्यांची पाठशिवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:03 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे.

ठळक मुद्देबोडके झाले रान : पर्यटकही पडले मोहात

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बोडके झालेले रानही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरव्यागार आणि घनदाट वृक्षवेलींनी मोहित करणारे मेळघाट अभयारण्य पानगळीमुळे वाळवंटासम भासत आहे. त्यातही दिवसभर ऊन-सावल्यांचा पाठशिवणीचा सुरू असलेला खेळ पर्यटकांना मोहिनी घालणारा ठरला आहे.राज्यातील एक अग्रगण्य थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा पर्यटनस्थळाचा नावलौकिक आहे. समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेल्या या पर्यटनस्थळावर हजारो पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. येथील विविध ऐतिहासिक व महाभारतकालीन वास्तूंचा जतन केलेला ठेवा, मनोवेधक पॉइंट, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, उंच पहाडावरून शेकडो फूट खाली कोसळणारे धबधबे, गगनचुंबी हिरव्या डोंगररांगा, दाट धुके अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांनी चिखलदरा समृद्ध आहे. उन्हाळा लागताच मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्याने हिरवेगार असलेले मेळघाट जंगल व विविध पॉइंट आता वाळवंटासम झाले आहेत. डोंगर-दऱ्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. पानगळ झाल्याने झाडांचे सांगाडे तेवढे उभे आहेत.घाटवळण अन् उंच पहाडचिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांना ऊन-सावल्यांचा खेळ मोहात पाडून जातो. घाटवळणाच्या उंच पहाडावर पर्यटकांची वाहने थांबण्याची काही ठिकाणे आहेत. तेथे पर्यटक थांबून तेथून सावल्यांच्या खेळाचा मनोवेधक नजारा पाहतात. सावलीच्या मागे ऊन धावत असल्याचे हे चित्र लक्षवेधी ठरले आहे. संपूर्ण उन्हाळाभर मेळघाटच्या घनदाट जंगल वाळवंटाप्रमाणे भासत असले तरी मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळताच सांगाडे दिसत असलेल्या झाडांवर नवीन पालवी फुटते; हिरवेगार घनदाट जंगल डोळ्यांचे पारणे फेडते, हे विशेष.कमी पाऊस, वृक्षतोड आणि वणवामेळघाटात दरवर्षी पावसाची नोंद कमी-कमी होत असल्याचे गंभीर चित्र आहे. दुसरीकडे जंगलात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वृक्षतोड आणि मानवनिर्मित आगी संतापजनक आहे. जंगलात वृक्षतोड करून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण व शेतजमीन तयार करणे तसेच तेंदुपत्ता, मोहफुले, बारशिंगे उचलता यावी आणि गुरांसाठी चारा मोठ्या प्रमाणात निघावा, या आणि इतर कारणांसाठी जंगलात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. वनविभाग आणि आदिवासींचा या मुद्द्यावर अनेकदा संघर्ष उडाला आहे.

टॅग्स :Melghatमेळघाट