शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वीटभट्ट्यांचा कहर, कोंडेश्वर जंगल भकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:22 IST

अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वीटभट्ट्यांचा धूर अन् धुळीने शहरवासीय तर त्रस्तच आहेच. पण, कोंडेश्वर जंगलदेखील भकास केल्याचे वास्तव आहे. एकीकडे शासन वनस्पतींच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपए खर्च करीत असताना स्थानिक प्रशासनच त्याला फाटा देत असल्याचे ज्वलंत उदाहरण श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान परिसरात दिसून पडते आहे.

ठळक मुद्देधूर अन् धुळीने आरोग्य धोक्यात : प्रशासनाचे अभय, कारवाई होणार का?

श्यामकांत सहस्त्रभोजने।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वीटभट्ट्यांचा धूर अन् धुळीने शहरवासीय तर त्रस्तच आहेच. पण, कोंडेश्वर जंगलदेखील भकास केल्याचे वास्तव आहे. एकीकडे शासन वनस्पतींच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपए खर्च करीत असताना स्थानिक प्रशासनच त्याला फाटा देत असल्याचे ज्वलंत उदाहरण श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान परिसरात दिसून पडते आहे.बडनेरा शहरालगत तसेच कोंडेश्वर एमआयडीसी अंजनगाव बारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. अलीकडे वीटभट्ट्या बऱ्याच वाढल्या आहेत. पूर्वी मोजक्याच वीटभट्ट्या होत्या. वाढलेल्या वीटभट्ट्या सर्रास मार्गालगतच उभारण्यात आल्या आहेत. दुतर्फा असणाऱ्या वीटभट्ट्यांमुळे मार्गावरून जाणाºया पायदळ तसेच वाहन चालकांना धूर व धुळीचा प्रचंड मनस्ताप, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची ओरड आहे. बऱ्याच वीटभट्ट्या वनविभागाच्या हद्दीत आहेत. त्याच्या धुराने व धुळीने कोंडेश्वर जंगल भकास झाल्याचे वास्तव आहे. पूर्वी कमी वीटभट्ट्या होत्या. त्याही शहरापासून व जंगलापासून दूर होत्या. त्याचा फारसा त्रास जाणवत नव्हता. अलीकडे या व्यवसायात अनेक जण उतरल्याने शासन नियम धाब्यावर बसविले जात आहे. कोंडेश्वर जंगलालगतच्या वीटभट्ट्यांमुळे जंगल भकास झाले आहे. वनविभाग, महसूल विभाग व प्रदूषण विभागाच्या दुर्लक्षामुळेच असे चित्र समोर येऊ लागले आहे.एकमेव चिमणी भट्टाकोंडेश्वर मार्गावर एकमेव चिमणी भट्टा आहे. त्याचा धूर हवेत विरतो. मात्र असंख्य वीटभट्ट्या विना चिमण्यांच्याच सुरू आहेत. त्याचे प्रदूषण शहराला व जंगलासाठी धोकादायक ठरत आहे. प्रदूषण विभाग झोपेत असल्यासारखेच काम करीत असल्याचे त्रस्त नागरिकांकडून व वन्यप्रेमी मध्ये बोलल्या जात आहे.महसूल विभागाचा वरदहस्त, ठोस पावले उचलाप्रशासनाची भीती न बागळगता राजरोसपणे अगदी रस्त्याच्या दुतर्फा वीटभट्ट्या उभारण्यात आल्या. महसूल विभागाचे यावर नियंत्रण असायला पाहिजे. मंडळ अधिकारी व तलाठी नेमके यासाठी करतात तरी काय? त्यांच्यावर कृपा कुणाची. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या हटविल्यास कोंडेश्वर देवस्थानात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल. एमआयडीसी व अंजनगाव बारी मार्गावरून मोठ्या संख्येत नागरिक जात असतात. त्यांनादेखील शारीरिक इजांपासून दिलासा मिळेल.वीटभट्ट्यांना विरोध नाही, नियमाने चालवाघरकामांसाठी वीटभट्ट्या असणे जरुरी आहे. तो व्यवसाय आहे. त्याच्या भरवशावर बऱ्याच लोकांची उपजिविका आहे. मात्र, नियमांचे देखील पालन झाले पाहिजे. वाट्टेल तिथे भट्ट्या टाकून नागरिकांच्या जिवीताशी खेळू नका. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या विटभट्ट्या हटविण्यात याव्या, प्रदूषणावर नियंत्रण बसवावे, धुळीसाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने आरखून द्याव्यात.वनविभाग कारवाई करेल काय?जंगलालगत व वनहद्दीत काही वीटभट्ट्या आहेत. नियमानुसार तसे करताच येत नाही. शासन वनसंपदेवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश दिला जातो. मात्र, त्याला वनविभागच फाटा देत आहे. कोंडेश्वर जंगल भकास करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल पुढे येत आहे. वनविभागाने मूग गिळून बसू नये. जंगल वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

टॅग्स :Kondeshwarकोंडेश्वर