शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वऱ्हा येथे जगावेगळी तारामायदेवीची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:07 IST

तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.

ठळक मुद्देपूजेत शेती अवजारांसह, मातीची खेळणीहीसर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.देवीपूजनाच्या अनुषंगाने परंपरेनुसार पूजेच्या पाच दिवस आधीपासून याची लगबग सुरू होते. काही कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. तर काहींनी शेतीसाठी लागणारी अवजारे सुताराकडून तयार करून घेतली. काहींनी कुंभारकडून मातीची खेळणी पूजेसोबत मांडायला तयार करून घेतली. या सर्वाची यावेळी पूजा केली जाते. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावातून बेरड अर्थात पूजेत वापरण्यासाठी धान्य गोळा केले. पूजेचे दिवशी दुपारी १२ पासून जवळपास दोन क्विंटल शिरा तयार करण्यात आला. प्रसाद तयार होताच गावातील सर्व सीमापूजनाचा कार्यक्रम सुरू झाला. १०-१२ लोकांचा एक अशाप्रकारे पाच गट करून गावसीमेवर जाऊन पूजा करण्यात आलीे. सीमापूजनाचे कार्यकर्ते परत आल्यानंतर मंदिरात देवीपूजेला सुरुवात झाली.श्री हनुमान मंदिर संस्थानात आरती करून वेगळ्याच प्रकारच्या वाट्यांमध्ये मंदिरापासून या देवीपूजा आरतीची व मिरवणुकीची सुरुवात झाली. प्रत्येकाकडे सोपविलेली जबाबदारी ते पूजेचे साहित्य, की देवीची खेळणी, सर्वानी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.सीमापुजला जाणाऱ्या भाविंकाना त्रास होवू नये यासाठी हातात खराटा हातात घेण्याचे व बेरड वाटप करून धूमधडाक्यात आणि तेवढ्याच उत्साहाने करतात. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तारामाय मंदिरात उदो-उदोचा गजर करीत पोहोचल्यानंतर. येथे पुजा करून सर्व जण गावाकडे पोहोचले. जोपर्यंत लोक परत येत नाही, तोपर्यंत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत सुरू असते.हे आहे पूजेचे वेगळेपणतारामायदेवीच्या पूजेत वखर, डवरे आदी शेती साहित्यासह स्वावलंबतेचा धडा देणारा चरखा, स्वयंपाकासाठी वापरली जाणारी, परंतु खेळण्यासाठी तयार केलेली मातीची भांडी याचीदेखील यावेळी पूजा केली जाते. यासाठी गावातील सर्व धर्माचे नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहकार्य करतात.सर्व जाती-धर्मातल्या नागरिकांचा सहभाग असलेला, परंतु यामधून स्वंयपूणतेची शिकवण देणारा हा उत्सव आहे. यानंतर धार्मिक सप्ताहाला सुरूवात होते.- पंडितराव मालधुरे, सचिव, मारोती महाराज संस्थान.