शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वऱ्हा येथे जगावेगळी तारामायदेवीची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:07 IST

तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.

ठळक मुद्देपूजेत शेती अवजारांसह, मातीची खेळणीहीसर्व जाती-धर्माच्या नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील वऱ्हा या गावी शेकडो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध प्रथमा अर्थात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तारामायदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे. जुन्या काळातील परंपरा लयाला जाऊन या आयोजनामागील उद्देश आता सामाजिक बांधीलकी व गावाची एकजूट असा उदात्त झाला आहे.देवीपूजनाच्या अनुषंगाने परंपरेनुसार पूजेच्या पाच दिवस आधीपासून याची लगबग सुरू होते. काही कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. तर काहींनी शेतीसाठी लागणारी अवजारे सुताराकडून तयार करून घेतली. काहींनी कुंभारकडून मातीची खेळणी पूजेसोबत मांडायला तयार करून घेतली. या सर्वाची यावेळी पूजा केली जाते. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावातून बेरड अर्थात पूजेत वापरण्यासाठी धान्य गोळा केले. पूजेचे दिवशी दुपारी १२ पासून जवळपास दोन क्विंटल शिरा तयार करण्यात आला. प्रसाद तयार होताच गावातील सर्व सीमापूजनाचा कार्यक्रम सुरू झाला. १०-१२ लोकांचा एक अशाप्रकारे पाच गट करून गावसीमेवर जाऊन पूजा करण्यात आलीे. सीमापूजनाचे कार्यकर्ते परत आल्यानंतर मंदिरात देवीपूजेला सुरुवात झाली.श्री हनुमान मंदिर संस्थानात आरती करून वेगळ्याच प्रकारच्या वाट्यांमध्ये मंदिरापासून या देवीपूजा आरतीची व मिरवणुकीची सुरुवात झाली. प्रत्येकाकडे सोपविलेली जबाबदारी ते पूजेचे साहित्य, की देवीची खेळणी, सर्वानी उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.सीमापुजला जाणाऱ्या भाविंकाना त्रास होवू नये यासाठी हातात खराटा हातात घेण्याचे व बेरड वाटप करून धूमधडाक्यात आणि तेवढ्याच उत्साहाने करतात. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तारामाय मंदिरात उदो-उदोचा गजर करीत पोहोचल्यानंतर. येथे पुजा करून सर्व जण गावाकडे पोहोचले. जोपर्यंत लोक परत येत नाही, तोपर्यंत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत हनुमान मंदिरात अखंड कापूरज्योत सुरू असते.हे आहे पूजेचे वेगळेपणतारामायदेवीच्या पूजेत वखर, डवरे आदी शेती साहित्यासह स्वावलंबतेचा धडा देणारा चरखा, स्वयंपाकासाठी वापरली जाणारी, परंतु खेळण्यासाठी तयार केलेली मातीची भांडी याचीदेखील यावेळी पूजा केली जाते. यासाठी गावातील सर्व धर्माचे नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहकार्य करतात.सर्व जाती-धर्मातल्या नागरिकांचा सहभाग असलेला, परंतु यामधून स्वंयपूणतेची शिकवण देणारा हा उत्सव आहे. यानंतर धार्मिक सप्ताहाला सुरूवात होते.- पंडितराव मालधुरे, सचिव, मारोती महाराज संस्थान.