शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

निधीअभावी रखडले गडगा प्रकल्पाचे काम

By admin | Updated: January 30, 2016 00:18 IST

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष सातत्याने वाढत असल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.

सिंचनाचा बोजवारा : शेतजमीन खरेदी करून लोटले चार वर्षेधारणी : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष सातत्याने वाढत असल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्येचे लोण आता मेळघाटातही पोहोचू पाहात आहे. मेळघाटात तर सिंचनाचा पुरता बोजवारा उडाला असून जे प्रकल्प पूर्णत्वास गेले त्यातून एक थेंब पाणी सिंचनासाठी मिळालेले नाही. तालुक्यातील पहिले मध्यम प्रकल्प म्हणून कावरा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी उदयास आले. या सिंचन प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कावरा प्रकल्पाचे कालवे सिंचनहीन बनले आहे. म्हणून शासनाचे कोट्यवधी रूपये प्रकल्पाच्या नावावर पाण्यात गेले. अशाच प्रकारे चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तालुक्यातील माणसुधावडी येथे गडगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पावर शासनाकडून निधीच उपलब्ध करून दिला नसल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचेही भविष्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून आकारास येत असलेला गडगा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार होता. अशा भुलथापा देऊन सिंचन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दरात बळकावल्या होत्या. जमिनीही गेल्या व हाती आली बेरोजगारी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. पहाडपट्ट्यात सिंचनाचा प्रश्न बिकट असताना राज्य शासन सिंचन निधी उपलब्ध करून देत नाही म्हणून भाजपला मतदान करून मेळघाटवासी चुकले तर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी शेतकरी व्यक्त करू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)