शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

वनजमिनींची कार्य आयोजना गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:14 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार अनभिज्ञ : महसूलच्या ताब्यातील वनजमिनी बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमीन असूनही याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे.२५ आॅक्टोबर १९८० रोजी वनसंवर्धन कायदा अस्तित्वात आला. परिणामी वनजमिनींचा वापर करताना कार्य आयोजना मंजूर करणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक २०२/९५ आणि १७१/९६ टी.एन. गोदावरन प्रकरणी निकाल देताना मंजूर कार्य आयोजनेनुसार वनजमिनींवर कामे झाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिलेत. ही बाब अन्य विभागांच्या ताब्यात असलेल्या वन संज्ञेतील सर्व जमिनींना लागू करण्यात आली. परंतु, राज्यातील महसूल विभागाच्या ताब्यात ३३.५ लक्ष स्क्रब जमीन, तर १२ लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत (नोटीफाईड) अशी ४५.५० लाख हेक्टर वन संज्ञेतील जमीन आहे. मात्र, वनविभाग मालकीच्या या जमिनींचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य आयोजना मंजूर करून घेतली नाही. त्यामुळे महसूल विभागाने गेल्या ३७ वर्षांत या वनजमिनींची उत्पादकता रसातळाला नेल्याचे वास्तव आहे. वनसंवर्धन कायदा १९८० नियम १९८१ व २००३ नुसार प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक यांना महसूल अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रदान केले आहे. तथापि, या अधिकाराचा कोणत्याही वनाधिकाºयाने वापर केलेला नाही. त्यामुळे महसूल विभागाने विविध वापराच्या नावे घेतलेल्या वनजमिनींबाबत राज्य शासनदेखील ‘सायलेंट झोन’मध्ये असल्याचे दिसून येते. वनजमिनींचे कार्य आयोजना मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. परंतु, वनविभागाने ’महसूल’च्या ताब्यातील जमिनींबाबतचा प्रस्ताव पाठविला नाही.महसूल, पोलीस अधिकारीसुद्धा दोषीभारतीय वन अधिनियम १९२७ कलम ६६ नुसार भारतीय वनसेवेच्या अधिकाºयांनी महसूल अधिकाºयांना वनगुन्हे रोखण्यासाठी परावृत्त करणे गरजेचे होते. याशिवाय कलम ७९ नुसार याप्रकरणी महसूल व पोलीस अधिकाºयांनी वनाधिकाºयांना सहकार्य आणि साहाय्य करणे बंधनकारक केले आहे. याची जाणीव असताना अस्तित्वात असलेल्या वनकायद्यातील तरतुदींचे पालन करून महसूल अधिकाºयांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, महसूल आणि पोलीस अधिकारी यांनी हा विषय बेदखल केला आहे.प्रधान वनसचिवसुद्धा हतबलमहसूलच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी राज्याचे प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी ८ डिसेंबर २०१६ रोजी शासनादेश काढला. ३१ मार्च २०१७ पर्यंत वनजमिनी परत करा, असा फतवा जारी केला. मात्र, प्रधान वनसचिव खारगे हे महसूलच्या लॉबीपुढे हतबल झाले. दोन वर्षांच्या कालावधी झाला असताना इंचभरही वनजमीन ते परत घेऊ शकले नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: लक्ष देऊन वनजमिनी परत मिळवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.