शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

महिला सुरक्षेचे ‘विशाखा’ अस्त्र कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:15 IST

शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी ‘अस्त्र’ ठरणाऱ्या विशाखा समितीचे अस्तित्त्व जिल्ह्यात कागदापुरतेच आहे.

शासकीय कार्यालयातील स्थिती : नोकरदार महिलांची घुसमट सुरूचचेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शासकीय व निमशासकीय कार्यालयातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावरील अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी ‘अस्त्र’ ठरणाऱ्या विशाखा समितीचे अस्तित्त्व जिल्ह्यात कागदापुरतेच आहे. या समस्यांबाबत अधिक जनजागृती नसल्याने अन्याय हल्ले होणाऱ्या महिलांवर अत्याचाराच्या घटनांना वाचा फूटत नाही. परिणामी शासकीय निमशासकीय नोकरदार महिलांची घुसमट वाढत आहे. सर्व शासकीय व निमशासकीय, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयामध्ये महिलांवरील लैंगिक शोषणाची तक्रार ऐकून निवाडा देण्यासाठी ‘विशाखा’ समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापनच झालेलीनाही. अमरावती शहरासह तालुका पातळीवर जवळपास १५० ते १७५ कार्यालये आहेत. काही कार्यालयांत समिती असली तरी नियमित बैठक होत नाही. वर्षभरात विशाखा समित्यांच्या माध्यमातून एकही तक्रार दाखल झाल्याची नोंद नाही. नोकरदार महिलांना बदनामीच्या भितीने तक्रार देत नसल्याचे चित्र आहे. ‘विशाखा’ समितीला विशेष अधिकारशासकीय, निमशासकीय कार्यालयात स्थापित विशाखा समितीकडे महिला आपल्यावरील अत्याचाराची लेखी तक्रार करू शकतात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीचे सदस्य दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत सर्व पुरावे तपासतात. त्यात दोषी ठरलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविणे, कार्यालयातून बदली करणे अशा प्रकारची शिक्षा समिती देऊ शकते. विशाखा समितीकडे न्याय न मिळाल्यास पीडित महिलाआयोगाकडे किंवा न्यायालयात दाद मागू शकते.