शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी महिला रस्त्यावर

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

आरडीसींना निवेदन : शेतकरी संघटना महिला आघाडीची मागणीअमरावती : सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कांदा खरेदी साठी शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यंदा कांदा उत्पादकांनी परिश्रमाने पीक काढले. मात्र कांद्यासाठी त्याने केलेले श्रम आणि खर्च लक्षात घेता कांद्याला भाव अल्प असल्याने छदामही वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. अशातच कांदाचे भाव वाढताच शासनाच्या वतीने कांदा जीवनावश्यक यादीमध्ये टाकण्यात येतो. शिवाय कांदा निर्यातीचा निर्णयही तातडीने घेवून भाव पाडण्यात येतो, असा आरोप शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने केला आहे. त्यामुळे यंदा कांदा पिकांचा खर्चही वसूल होण्याची शक्यता फारच कमी आहे. शासनाने त्वरित शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करावे. दुष्काळामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आहेत. यातून बाहेर काढण्यासाठीनव्याने कर्जाचे वाटप करावे आणि आधार द्यावा याशिवाय शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना महिला आघाडीच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. यावेळीे निलिमा शेरेवार, रजनी दातीर, सुनीता सुने, मनीषा सुने, प्रतिभा गादे, संजीवनी आगरकर, उमा भोयर, शोभा पेटले बोंडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)