शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धामणगावात भर पावसात महिलांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

सिटू ने घेतला पुढाकार फोटो - शालेय पोषण आहार, मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष धामणगाव रेल्वे : कोरोनाकाळात ...

सिटू ने घेतला पुढाकार

फोटो -

शालेय पोषण आहार, मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष

धामणगाव रेल्वे : कोरोनाकाळात शालेय पोषण आहार योजनेशी संलग्न महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात कोरोना संसर्ग झालेला असतानाही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नसल्याच्या मुद्द्यावर सोमवारी भर पावसात स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

सिटूचे प्रमुख तथा शेतकरी शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पंचायत समितीसमोरील तहसील कार्यालयाच्या परिसरात भर पावसात दोन तास धरणे आंदोलन या महिलांनी केले. पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा न करता ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, पोषण आहार महिलांना कामगाराचा दर्जा देऊन दरमहा १८ हजार रुपये मानधन मिळावे, ‘सेंट्रल किचन’चे धोरण बंद करावे कोरोनाकाळात शालेय पोषण महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

महिलांनी पंचायत समिती प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी यांना निवेदन दिले. यावेळी महादेव गारपवार, संगीता चौधरी, सीमा सडमाके, पद्मा नेवारे, साकिया बानो शाह, सुहासिनी नेमाडे, नलिनी पुराणिक, शीला नखाते, माया वानखडे, प्रफुल्लता आंबटकर, रंजना वानखडे, शोभा कुरडकर, सुनीता व्यवहारे यांची उपस्थिती होती.