शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

अमरावती : राज्याच्या वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित आहे. त्यामुळे हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांना गोळी झाडून आत्महत्या करावी ...

अमरावती : राज्याच्या वनविभागात महिला अधिकारी असुरक्षित आहे. त्यामुळे हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांना गोळी झाडून आत्महत्या करावी लागली. परिणामी दीपाली यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वनपरिक्षेत्राधिकारी संघटनेच्यावतीने शुक्रवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण वनविभाग ढवळून निघाला आहे. वनपरिक्षेत्राधिकारी संघटनांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) पी. साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या पुढ्यात जिल्ह्यातील आरएफओंनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, गुगामलचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या कारनामे मांडले. आरएफओ चव्हाण यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला, ही बाब आरएफओ संघटनेचे अध्यक्ष कांतेश्वर बाेबडे, सरचिटणीस नीलेश गांवडे, गणेश टेकाडे, कैलास भुंबर आदींनी मांडली. उपवनसंरक्षकांना आरएफओंच्या निलंबनाचे अधिकार असल्याने ते दुरुपयोग करतात, अशी कैफियत आरएफओंनी मांडली. यावेळी मृत दीपाली चव्हाण यांचे मामा व मामी यांनीसुद्धा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

--------------------

दोषीवर कारवाईसाठी भाजपचे आंदोलन

वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी भाजपच्यावतीने शुक्रवार जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारासमोर आंदोलन करण्यात आले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. यावेळी महापौर चेतन गावंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शिवराय कुळकर्णी, बादल कुळकर्णी आदी उपस्थित होते.