शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सांगळूद येथे महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST

येवदा : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण करण्यात आली. केस धरून तिला घराबाहेर काढण्यात आले. ७ मार्च रोजी रात्री ...

येवदा : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण करण्यात आली. केस धरून तिला घराबाहेर काढण्यात आले. ७ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. येवदा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कुलदीप निरंजन इंगळे (सांगळूद) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------------

नाचोणा शिवारातून गिअर बॉक्स लंपास

दर्यापूर : खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत नाचोणा शिवारातून ९ हजार रुपये किमतीचे गिअर बॉक्स लंपास करण्यात आले. ५ ते ६ मार्चदरम्यान ही घटना घडली. खल्लार पोलिसांनी शेतमालक राजेश गोंडचर (३३, खुर्माबाद) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

वरूड : चारित्र्यावर संशय घेऊन २६ वर्षीय विवाहितेला मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. १५ एप्रिल २०१२ पासून हा प्रकार सुरू असल्याने ती सन २०२० पासून माहेरी राहत आहे. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी दिनेश जिचकार (रा. सावंगी जिचकार) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

वरूड येथे तरुणाला मारहाण

वरूड : येथील राजुरा नाका परिसरात अनिकेत थोरात (१९, आंबेडकर चौक) याला काठीने मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून ८ मार्च रोजी हा प्रसंग घडला. वरूड पोलिसांनी आरोपी सुरेश नेहारे, आशिष नेहारे, राहुल नेहारे (राजुरा नाका) यांच्याविरू द्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

ढाणा पुसला येथे मारहाण

शेंदूरजना घाट : माझ्या मुलीला फाशी देऊन मारले, असा आरोप करून प्रमोद मनिराम उईके (५५, ढाणा पुसला) यांना काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उईके यांच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी आरोपी राजू मसराम (ढाणा पुसला) विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

विहिगाव फाट्यावरून अवैध रेती वाहतूक

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील विहिगाव येथून एमएच २७ एल ५४८२ या ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास रेती असा ५ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ८ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. रहिमापूर पोलिसांनी आरोपी मंगेश प्रजापती (३०, रा. विहिगाव) विरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------

चारित्र्यावर संशय, विवाहितेचा छळ

नांदगाव खंडेश्वर : चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासरच्या अन्य मंडळीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका ३० वर्षीय विवाहितेने मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्याप्रकरणी भारत मुल्हार व अन्य चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

नागझरी फाट्याजवळ अपघात

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील नागझरी फाट्याजवळ ट्रेलरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. ४ मार्च रोजी रात्री ११ वाजता हा अपघात घडला. त्रिमूर्तीनगर अमरावती येथील सूरज नागे हा दोन मित्रांसह कारंजा लाड येथून परतत असताना ही घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरजे ०४ बीजी ६९५५ या ट्रेलरच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

सावळी बु. येथे मारहाण

आसेगाव पूर्णा : बकऱ्या चारण्याकरिता इकडे कसा काय आला, अशी विचारणा करत रविकांत धाकडे (३५, रा.सावळी बु) याला मारहाण करण्यात आली. ८ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी श्रावणकुमार उत्तम धाकडे, निखिल विजय धाके (दोन्ही. रा. सावळी बु.) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

रसुलापूर रस्ता बांधकामाविरोधात ग्रामस्थ एकवटले

चांदूर बाजार : तालुक्यातील रसुलापूर ते धानोरा या डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा उपयोग केला जात आहे. यामुळे स्थानिक सरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आहे. रसुलापूर ते धानोरा हा १.३ किलोमीटर डांबर रस्त्याचे काम सुरू आहे.

--------------

रेल्वे गेट परिसराला अतिक्रमणाचा विळखा

चांदूर रेल्वे : शहरालगत रेल्वे गेटलगतची दुकाने हटविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य संदीप सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रस्त्याच्या कडेला एक फूट लागूनच असून एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहे.

-------------------

व्याघ्र प्रकल्पाचे आडमुठे धोरण नंदनवनाच्या मुळावर

चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या सीमारेषा पाहता दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. परिणामी खड्डेमय झालेल्या रस्त्यांची परवानगी न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. खराब रस्त्यांमुळे वारंवार मिळणाऱ्या खोट्या आश्वासनांचा मेळघाटात संताप व्यक्त होत आहे.

--------------

दुधविक्रेते संकटात, पशुखाद्याचे दर वाढले

कावली वसाड या गावातून रोज ५०० लिटर दूध शहरात विक्रीकरिता न्यावे लागत आहे. कावली, दाभाडा, वाठोडा या गावात दूध डेअरी असून त्यामध्ये हजारो दूध संकलित करण्यात येत आहे. गावातील काही तरुण धामणगाव रेल्वे येथे १० ते १२ किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी घरोघरी दूध विकत आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या. परंतु दुधाचे दर वाढत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांपुढे मोठे संकट ओढले जात आहे.

---------------

निदानजी महाराज संस्थानाचा कायापालट

अंजनगाव बारी : गावाबाहेर रेल्वे मार्गालगत ३५० वर्षांपासून स्थित असलेले निदानजी महाराज संस्थान विकसनशील असूनही येथील निसर्गरम्य वातावरण बघता दररोज शेकडो पर्यटक-भाविक या स्थळाला भेट देतात. पूर्वी हे ठिकाण पडक्या स्वरुपात होते. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याला भाविकांनी स्वखर्चाने सुरुवात केली. आज हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात २ हेक्टर जागेमध्ये तोऱ्यात उभे आहे.

----------

फोटो पी ११ बावने

कौसल्याबाई बावणे

कु-हा : येथील वाॅर्ड नं. ५ मधील कौसल्याबाई बापूरावजी बावणे (८८) यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

---------

इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

अमरावती : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ मधील खरीप हंगामातील/दुष्काळी भागातील १० वी व १२ वीचे विद्यार्थी परीक्षा शुल्कमाफीस पात्र असून, अद्याप ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या/पालकांच्या-आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

सन २०१९-२० मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

फोटो पी ११ सालबर्डी

महावितरण कर्मचाऱ्यांकडून आगग्रस्तांना मदत

मोर्शी : तालुक्यातील सालबर्डी येथील सुनील धुर्वे यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. परिणामी धुर्वे कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान, महावितरणच्या अभियंता सहकारी पतसंस्था, एसईएस संघटना, अमरावतीच्या अभियंत्यांनी एकूण ३० हजार रुपये आर्थिक मदत त्यांना दिली. महावितरणचे चेतन कडू, रोहित म्हस्के, हर्षल धोटे व कर्मचारी मंगेश गावंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

-------------