शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जि.प.शाळा बंद होणार का? १५७५ शाळा आणि शेकडो शिक्षकांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:54 IST

Amravati : झेडपी शाळांवर ४८५३ एचएम, शिक्षक कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील ५०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून १५ मार्च २०२५ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी केली आहे.

पूर्वी इयत्ता ६ वी ते ८ वी करिता ३६ विद्यार्थ्यांवर ३ शिक्षक मान्य होते. मात्र नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतर करावे लागणार आहे. या बदलामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यातील ५०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यात जि. प. शाळांवर ३९६७ शिक्षक कार्यरत आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा किती?जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक १ हजार ५७५ शाळा आहेत. या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पाच हजारांवर शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

संचमान्यतेचे नवीन धोरण काय ?संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ वी ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत. १५० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापकाचे पदही राहणार नाही.

शिक्षकांची संख्या घटणार२००९ पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमध्येसुद्धा इयत्ता ५ ते ७ वीसाठी ४५ विद्यार्थ्यांवर ४ शिक्षक होते. आता नवीन संचमान्यतेच्या निर्णयामुळे इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी ७७ विद्यार्थ्यांमागे केवळ २ शिक्षक राहणार आहेत.

झेडपीच्या शाळांवर संकटराज्य शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांवर संकट ओढवणार आहे. कारण अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. याशिवाय नवीन धोरणात ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षकांचा निकष लावल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळेवर संकट अटळ आहे.

जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले?नवीन संचमान्यता धोरण, खासगी शाळांचे वाढते आकर्षण, पटसंख्येतील घट आदी बदलांमुळे जिल्हा परिषद शाळांमसोर संकट उभे झाले आहे.

दृष्टीक्षेपात आकडेवारीएकूण झेडपी शाळा-१५७५कार्यरत मुख्याध्यापक-७६५शाळांमधील शिक्षक -३९६७एकूण संख्या - ४८५३

"झेडपी शाळा बंद पडल्या तर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिकावे कुठे? याचा विचार शासनाने केला पाहिजे. शिक्षणातील आर्थिक तरतूद शासनाने वाढविली पाहिजे."- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी. प्राथमिक शिक्षक समिती

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAmravatiअमरावती