शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळा बंद होणार का? १५७५ शाळा आणि शेकडो शिक्षकांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:54 IST

Amravati : झेडपी शाळांवर ४८५३ एचएम, शिक्षक कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील ५०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून अनेक शाळांचे अस्तित्व धोक्यात आले असून १५ मार्च २०२५ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी केली आहे.

पूर्वी इयत्ता ६ वी ते ८ वी करिता ३६ विद्यार्थ्यांवर ३ शिक्षक मान्य होते. मात्र नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतर करावे लागणार आहे. या बदलामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यातील ५०० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यात जि. प. शाळांवर ३९६७ शिक्षक कार्यरत आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा किती?जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक १ हजार ५७५ शाळा आहेत. या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पाच हजारांवर शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

संचमान्यतेचे नवीन धोरण काय ?संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ वी ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत. १५० पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापकाचे पदही राहणार नाही.

शिक्षकांची संख्या घटणार२००९ पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमध्येसुद्धा इयत्ता ५ ते ७ वीसाठी ४५ विद्यार्थ्यांवर ४ शिक्षक होते. आता नवीन संचमान्यतेच्या निर्णयामुळे इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी ७७ विद्यार्थ्यांमागे केवळ २ शिक्षक राहणार आहेत.

झेडपीच्या शाळांवर संकटराज्य शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळांवर संकट ओढवणार आहे. कारण अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. याशिवाय नवीन धोरणात ७८ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षकांचा निकष लावल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळेवर संकट अटळ आहे.

जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले?नवीन संचमान्यता धोरण, खासगी शाळांचे वाढते आकर्षण, पटसंख्येतील घट आदी बदलांमुळे जिल्हा परिषद शाळांमसोर संकट उभे झाले आहे.

दृष्टीक्षेपात आकडेवारीएकूण झेडपी शाळा-१५७५कार्यरत मुख्याध्यापक-७६५शाळांमधील शिक्षक -३९६७एकूण संख्या - ४८५३

"झेडपी शाळा बंद पडल्या तर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिकावे कुठे? याचा विचार शासनाने केला पाहिजे. शिक्षणातील आर्थिक तरतूद शासनाने वाढविली पाहिजे."- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी. प्राथमिक शिक्षक समिती

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAmravatiअमरावती