शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

साडेचार कोटींच्या रेतीमुळे अमरावती पोलिसांवरचा डाग पुसला जाणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:21 IST

अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता.

- चेतन घोगरेअमरावती : अमरावती-यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर चार दिवसांपूर्वी ९२ ट्रक व तीन पोकलँड पकडून चार कोटी ३८ लाखांचा मुद्देमाला अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. या कार्यवाहीमागील मुख्य कारण हे नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले आयपीएस जि. विजयकृष्ण यादव यांनी अमरावती येथील रेती व्यवसायिकांकडून लाखो रूपयांची लाच घेतल्यामुळे अडकले होते. याचा वचपा काढण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केल्याचे बोलले जात आहे.काही महिन्यांपूर्वी अमरावती-नागपूर महामार्गावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनमध्ये तीन महिन्यासाठी आलेले परीवेक्षाधीन आयपीएस अधिकारी जि. विजयकृष्ण यादव यांनी २७ मार्च ते २५ जून या कार्यकाळात ३० हून अधिक मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये सर्वात मोठी कारवाई म्हणजे १८० जनावरे, ५४ आरोपी व २० ट्रक तसेच अवैध रेतीची वाहतूक करणारे १५ ट्रक, १५ आरोपी तसेच १ कोटी ५० लाखाचा मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील रेतीचा तस्कर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचेसुद्धा रेतीचे ट्रक पकडण्यात आले होते. त्याच रेती तस्कराने आयपीएस यादव यांच्यावर लाचलुचपत विभागाचा सापळा रचून लाखो रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या सर्व प्रकरणांमध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रतिमा राज्यभरात मलीन झाली होती. या सर्व बाबींचा वचपा काढण्यासाठी सध्या अमरावती जिल्ह्याला लाभलेले परीविक्षाधीन आयपीएस अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ जिल्ह्यातून होणा-या अवैध रेती घाटावरून होणा-या ३२ ट्रकवर धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीमध्ये राज्यामधील सर्वात मोठी कार्यवाही केली व दोन कोटींच्यावर रेतीसाठा जप्त केला. तसेच त्याआधी परतवाड्यावरून जाणारा देशी दारूचा टि. पी. वाहतुकीचा माल हा रासेगावला न जाता रेतीघाट परिसरात अवैध वाटप करत असताना पकडला. त्यामुळे दारू व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यवाहीमुळे अमरावती ग्रामीण पोलिसांवर असलेला डाग पुसवून टाकल्याचे पोलीस विभागात बोलले जात आहे.रेतीवाल्यांकडून सावध राहा !याआधी आयपीएस अधिका-याने मोठी कारवाई केली म्हणून एसीबी विभागाने पोलीस अधिका-याची विकेट घेतली आहे तर आता राज्यामधली सर्वात मोठी कारवाई आहे. आता रेतीवले कोणाचा बळी घेणार, त्यामुळे रेतीवाल्यांकडून सावध राहण्याचा पोलीस विभागात या विषयाची चांगलीच चर्चा रंगत आहे.