शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांना यंदा तरी मिळणार का गणवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांना शाळेत एन्ट्री घेता आली नाही. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांनी निर्णय घेतला ...

अमरावती : कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थ्यांना शाळेत एन्ट्री घेता आली नाही. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांनी निर्णय घेतला आणि मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रत्येकी एक गणवेश घरपोच वितरण केले. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संक्रमणाचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू होईल की ऑनलाईन शिक्षण राहील, विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गतवर्षीपासून लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरूनच गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले अशा लाखो विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते. शासनाकडून तत्त्वत: यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदा २६ जूनपासून शालेय शिक्षण सुरू होणार असले तरी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे. त्यातच गणवेश वाटपाच्या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. आक्टोबरनंतर प्रक्रिया सुरू केली, तर जानेवारी-फेब्रुवारीत विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा असेल, तर त्यासाठी आतापासूनच पावले उचलणे आवश्यक असल्याचे विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट

गतवर्षी विद्यार्थ्यांना देण्यासाठी गणवेश शाळांनी खरेदी केले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकच गणवेश उपलब्ध करून देण्यात आला. यंदा गणवेश खरेदीची तयारी आतापासून सुरू केली, तर त्याचे वाटप योग्य वेळेवर करता येईल.

राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक समिती