शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गुन्हेगारांना अतिक्रमणाचा आधार पोलीस आयुक्त लक्ष देतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:23 IST

शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसाठी संकटाची चाहूल अधोरेखित करीत आहे.

ठळक मुद्देसामान्यजन असुरक्षित : अतिक्रमित व्यवसायस्थळांवर गुन्हेगारांचा वावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील प्रवीणनगरात नुकताच हत्येचा थरार घडला. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तरुण प्रस्थापित होण्यासाठी अतिक्रमणाचा आधार घेत असल्याची बाब पुढे आली आहे. अतिक्रमित जागेत पानटपरी, हातगाड्याच्या व्यवसाय स्थळावरील वाढती गुन्हेगारी सामान्यजनांसाठी संकटाची चाहूल अधोरेखित करीत आहे. ही चिंताजनक बाब असून, याकडे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर लक्ष देतील का, असा सवाल सामान्य अमरावतीकर करीत आहेत.सांस्कृतिक वारसा लाभलेली अंबानगरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. छोटे-मोठे पानठेले, कॅन्टीन, हातगाड्या, अंडा सेंटर आदी व्यवसाय अतिक्रमित जागेवर फोफावले आहेत. हेच ठिकाण टवाळखोरांचेही अड्डे बनले आहेत. अशाच ठिकाणांचा आधार घेत गुन्हेगारी प्लॅनिंगसुद्धा आखल्या जातात, असा संशय बळावत आहे. शहरातील सातुर्णा स्थित देशी दारूच्या दुकानांसमोरच्या रस्त्यालगतच काही दिवसांपूर्वी एकाची हत्या करण्यात आली. आरोपीच्या हातगाडीवर स्नॅक्स खाण्यासाठी गेलेल्या त्या तरुणाची धक्का लागल्याच्या कारणावरून हत्या केली गेली. शनिवारी प्रवीणनगरात एका पानटपरीजवळ अल्पवयीनाची हत्या करण्यात आली. या ठिकाणी बोलावून त्या अल्पवयीनाला चाकूने भोसकण्यात आले. यापूर्वीही शहरातील अतिक्रमित स्थळांवर वाद-विवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. अतिक्रमित स्थळांची ही पार्श्वभूमी पाहता, ही स्थळे गुन्हेगारांचे अड्डेच बनले आहे. तेथूनच गुन्हेगारी घटनांची रूपरेषा आखली जाते. अशा व्यवसायाआड चालणाºया घडामोडींचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथे होणारे वादविवाद व गंभीर गुन्हे अमरावतीकरांच्या मनात भीती निर्माण करीत आहेत. याच अनुषंगाने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर शहरात ड्राइव्ह घेतील का? महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा देण्यासोबत आयुक्तांनी लक्ष घालून असे अड्डे नेस्तनाबूत केल्यास शहरातील गुन्हेगारी नक्कीच कमी होईल, अशी अपेक्षाही अमरावतीकरांना आहे.अतिक्रमणाच्या मुद्द्यावर महापालिकेशी समन्वय साधला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस सुरक्षा पुरविली जाईल.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त.

टॅग्स :PoliceपोलिसEnchroachmentअतिक्रमण