शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बंद पडणाऱ्या दूध योजना पीपीपी तत्त्वावर पुनर्जीवित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:45 IST

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.

ठळक मुद्देशासनाचा पुढाकार : जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्रे बंद

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, परतवाडा व सेमाडोह (ता. चिखलदरा) ही तीन शीतकरण केंद्रे दूध मिळत नसल्याने बंद पडली आहेत.पीपीपी तत्त्वावर बंद पडलेल्या किंवा पडणाºया संस्था पुनर्जिवित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या १७ एप्रिल २०१४ च्या शासननिर्णयानुसार विहित प्रक्रियाद्वारा तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात दिली होती. २०१४ च्या शासन निर्णयाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पीपीपी प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांच्या नियुक्तीस पुढीत मुदतवाढ दिल्याचे आढळले नव्हते. त्यामुळे तांत्रिक सल्लागाराऐवजी ई-निविदा प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्याचे शासनाने ठरविले होते. अमरावती विभागातही अनेक शीतकरण केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत आहेत.दुधाला भाव नाहीशेतीला जोडधंदा म्हणून दुग्धविकास व्यवसायाला चालना मिळण्यासाठी शासनाने जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्र स्थापन केले. पण, ग्रामीण भागात शासकीय दुधाला चांगला भाव मिळत नसल्याने मोर्शी चार हजार लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्र बंद पडले आहे, परतवाडा चार हजार लिटर क्षमता व सेमाडोह पाच हजार लिटर क्षमतेची शीतकरण केंद्र बंद पडली आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार या केंद्राचे पुनर्जीवित करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली तीन शीतकरण केंद्रे बंद आहेत. दुधाच्या साठवण क्षमतेनुसार दूध मिळत नसल्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- संपत जांभुळे,जिल्हा दुग्धव्यवसायविकास अधिकारी, अमरावती