शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 11:19 PM

विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा सवाल : जुनच्या पहिल्या आठवड्यात येणार यादी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.तत्पुर्वी ३१ मे रोजी बदलीचा आदेश निघण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने एकाच टेबलवर राहून मलिदा लाटणाºयांची बदली होईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.८ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत तुर्तास १५८८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३ चे ४३० तर वर्ग ४ चे ११३२ कर्मचाºयांचा समावेश आहे. यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाºयांकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या जातात. यात अधीक्षकांसह वरिष्ट व कनिष्ट लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, शिपाई, बिटप्यून , स्वास्थ्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. यातील अनेक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. अनेक टेबलवर कमिशन मिळत असल्याने आणि ‘वरचा खर्च ’वरच्या वर भागत असल्याने अनेकांकडून बिदागीचा टेबल सोडण्याचा मोह सुटत नाही. आयुक्त हेमंत पवार यांनी अशा चिपकू कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची सुचना विभागप्रमुखांसह प्रभारी उपायुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त राहूल ओगले यांना दिले होते. बरहुकूृम अशा चिपकूंसह बदलीस पात्र असणाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात कर आणि स्वच्छता विभागात व्यापक फेरबदल करण्यात येणार असून काही सहायक आयुक्तांसह उपअभियंत्यामध्येही खांदेपालट करण्यात येणार आहे.२८ व २९ मे रोजी आयुक्त नसल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बदलीचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.बदली आदेश पाळणार ?ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात , त्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे , अन्य कर्मचारी रुजू होण्याची प्रतिक्षा न करता विभागप्रमुखांनी बदलीप्राप्त कर्मचाऱ्यास ‘रिलिव्ह’ करावे, सामान्य प्रशासन विभागास त्याबाबत अहवाल द्यावा, अन्यथा शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा बदली आदेशात असतो. मात्र आयुक्तांच्या त्या आदेशाला हरताळ फासत अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू होत नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी बदलीचे आदेश संबंधित कर्मचारी अधिकारी पाळतात की कसे , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.