शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:20 IST

विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा सवाल : जुनच्या पहिल्या आठवड्यात येणार यादी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.तत्पुर्वी ३१ मे रोजी बदलीचा आदेश निघण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने एकाच टेबलवर राहून मलिदा लाटणाºयांची बदली होईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.८ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत तुर्तास १५८८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३ चे ४३० तर वर्ग ४ चे ११३२ कर्मचाºयांचा समावेश आहे. यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाºयांकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या जातात. यात अधीक्षकांसह वरिष्ट व कनिष्ट लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, शिपाई, बिटप्यून , स्वास्थ्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. यातील अनेक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. अनेक टेबलवर कमिशन मिळत असल्याने आणि ‘वरचा खर्च ’वरच्या वर भागत असल्याने अनेकांकडून बिदागीचा टेबल सोडण्याचा मोह सुटत नाही. आयुक्त हेमंत पवार यांनी अशा चिपकू कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची सुचना विभागप्रमुखांसह प्रभारी उपायुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त राहूल ओगले यांना दिले होते. बरहुकूृम अशा चिपकूंसह बदलीस पात्र असणाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात कर आणि स्वच्छता विभागात व्यापक फेरबदल करण्यात येणार असून काही सहायक आयुक्तांसह उपअभियंत्यामध्येही खांदेपालट करण्यात येणार आहे.२८ व २९ मे रोजी आयुक्त नसल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बदलीचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.बदली आदेश पाळणार ?ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात , त्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे , अन्य कर्मचारी रुजू होण्याची प्रतिक्षा न करता विभागप्रमुखांनी बदलीप्राप्त कर्मचाऱ्यास ‘रिलिव्ह’ करावे, सामान्य प्रशासन विभागास त्याबाबत अहवाल द्यावा, अन्यथा शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा बदली आदेशात असतो. मात्र आयुक्तांच्या त्या आदेशाला हरताळ फासत अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू होत नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी बदलीचे आदेश संबंधित कर्मचारी अधिकारी पाळतात की कसे , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.