शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खुर्चीला चिकटलेल्यांची होईल का बदली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:20 IST

विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा सवाल : जुनच्या पहिल्या आठवड्यात येणार यादी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाकडून बदली करण्यात येणार आहेत.तत्पुर्वी ३१ मे रोजी बदलीचा आदेश निघण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने एकाच टेबलवर राहून मलिदा लाटणाºयांची बदली होईल का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.८ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाºया महापालिकेत तुर्तास १५८८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३ चे ४३० तर वर्ग ४ चे ११३२ कर्मचाºयांचा समावेश आहे. यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाºयांकडे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाºयांच्या प्रामुख्याने बदल्या केल्या जातात. यात अधीक्षकांसह वरिष्ट व कनिष्ट लिपिक, सहायक अधीक्षक, लेखापाल, शिपाई, बिटप्यून , स्वास्थ्य निरिक्षक आदींचा समावेश आहे. यातील अनेक कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत आहेत. अनेक टेबलवर कमिशन मिळत असल्याने आणि ‘वरचा खर्च ’वरच्या वर भागत असल्याने अनेकांकडून बिदागीचा टेबल सोडण्याचा मोह सुटत नाही. आयुक्त हेमंत पवार यांनी अशा चिपकू कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची सुचना विभागप्रमुखांसह प्रभारी उपायुक्त महेश देशमुख, सहायक आयुक्त राहूल ओगले यांना दिले होते. बरहुकूृम अशा चिपकूंसह बदलीस पात्र असणाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात कर आणि स्वच्छता विभागात व्यापक फेरबदल करण्यात येणार असून काही सहायक आयुक्तांसह उपअभियंत्यामध्येही खांदेपालट करण्यात येणार आहे.२८ व २९ मे रोजी आयुक्त नसल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बदलीचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे.बदली आदेश पाळणार ?ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात , त्यांनी तातडीने बदलीस्थळी रुजू व्हावे , अन्य कर्मचारी रुजू होण्याची प्रतिक्षा न करता विभागप्रमुखांनी बदलीप्राप्त कर्मचाऱ्यास ‘रिलिव्ह’ करावे, सामान्य प्रशासन विभागास त्याबाबत अहवाल द्यावा, अन्यथा शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा बदली आदेशात असतो. मात्र आयुक्तांच्या त्या आदेशाला हरताळ फासत अनेक कर्मचारी बदली ठिकाणी रुजू होत नाहीत. हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी बदलीचे आदेश संबंधित कर्मचारी अधिकारी पाळतात की कसे , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.