शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

वन्यजीव वळले नागरी वस्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:15 IST

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे जंगातील हिंस्र प्राणी गावापर्यंत येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील एका शेतकऱ्याला वाघ दिसल्याची अफवा पसरली होती.

ठळक मुद्देजंगलातील पाणवठे आटले : वनविभागाकडून सजग राहण्याचे आवाहन

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे जंगातील हिंस्र प्राणी गावापर्यंत येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील एका शेतकऱ्याला वाघ दिसल्याची अफवा पसरली होती. वाघाबाबत ती अफवा असली तरी तडशा आणि अस्वलांच्या शिरकावाला वनविभागाने दुजोरा दिला होता. अस्वालाची हिंस्त्रता अनेकांनी अनुभवली आहे. तालुक्यातही अस्वलीने शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नागरी वस्तीत शिरू पाहणाºया वन्यप्राण्यांचा अपघात होऊन ते मृत्यूच्या दाढेत ओढले जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाई या विषयांवर बराच ऊहापोह सुरू आहे. निसर्गाचा समतोल साधून जीवनसाखळी सुरळित राहण्यासाठी मानवासोबतच प्रत्येक लहानमोठा जीव आवश्यक असतो. या साखळीत जंगलांमध्ये राहणारे प्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, पाणीटंचाईचा फटका माणसांप्रमाणेच, कदाचित माणसापेक्षा जास्त बसतो तो या वन्य प्राण्यांना! उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटणे ही वन्य प्राण्यांसाठी मृत्युघंटाच असते. पाण्याची जागा बदलली तर हे प्राणी मरतील, पण दुसरीकडे पाणी पिण्यास जाणार नाहीत. यावरून त्यांची पाणवठयांबाबतची संवेदनशीलता दिसून येते.मात्र नैसगिर्क पाणवठे आटले. कृत्रिम पाणवठ्यांसाठी वनविभागाकडे निधी नाही, अशा पेचात वन्यप्राण्यांच्या तृष्णेचा प्रश्न दुय्यम बनला आहे. तालुक्याला हजारो हेक्टरचे जंगल लाभले असून त्यात अनेक प्रकारचे पशूपक्षी आहेत. यंदा तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जंगलातील पाणवठे आटल्यामुळे पशूपक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात शिवारासह गावातही आगेकूच करीत असल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीची वातावरण आहे.सातपुडा जंगलात वन्यप्राण्यांचा वावरमध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या वरूड तालुक्यात सातपुडा पर्वत आणि मोठे जंगल परिक्षेत्र आहे. या जंगलात अस्वली, बिबट, रोही, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, तडशा यासह इतरही हिंस्त्र वन्यप्राणी वास्तव्याला आहेत. यंदा अतितापमान आणि अत्यल्प पर्जन्यमानामुळे जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राण्यांनी गावाकडे कूच केली आहे.वन्यप्राण्यांकडून शेतीचेही नुकसानरोही, रानडुक्कर, कोल्हे शेतातील बागायती पिके तथा संत्राझाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तडशा व अस्वलींचे पदचिन्हे दिसून आल्याने रात्रीच्या ओलितावर परिणाम झाला आहे. तालुक्यातील वाई, पुसली, रवाळा, पंढरी, कारली, जामगाव, गव्हाणकुंड, पुसला, लिंगा करवार आदी परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतीचे नुकसान होत आहे.