शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘रिलेशनशिप’ पार्टनरकडून पत्नीला मारहाण; पतीने नोंदविला एफआयआर!

By प्रदीप भाकरे | Updated: June 5, 2023 16:28 IST

शहर कोतवाली हद्दीतील घटना : डायल ११२ ला पाचारण

अमरावती : आपल्या पत्नीला तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या मित्राने बेदम मारहाण केल्याची तक्रार एका पतीने नोंदविली आहे. ४ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास साईनगर ते अंबापेठ प्रवासादरम्यान ऑटोरिक्षामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी आसिफ खान मेहताब खान (४०, रा. हैदरपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीने डायल ११२ ला कॉल करून पोलिसांची मदत मागितली होती.

फिर्यादी व्यक्तीची पत्नी सामाजिक कार्यकर्ता आहे. आरोपी हा तिच्या ओळखीचा आहे. तिचे व आरोपीचे घनिष्ट संबंध असून, ते रिलेशनशिपमध्येदेखील आहेत. दरम्यान, सात ते आठ महिन्यांपासून आरोपी आसिफ खान हा जबरदस्ती फिर्यादी व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असतो. महिनाभरापूर्वी आरोपीने फिर्यादीच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी फिर्यादीने आरोपीस समजावण्याचा प्रयत्न केला. आसिफ उलटपक्षी त्यालाच जिवाने मारण्याच्या धमकी दिल्या.

असे घडले मारहाण नाट्य

४ जून रोजी रात्री १ च्या सुमारास फिर्यादी हे पत्नीसह साईनगरजवळ असताना आसिफ खानचा त्यांच्या पत्नीला कॉल आला. त्यानंतर दहा मिनिटात तो तेथे पोहोचला. त्याने फिर्यादीची माफी मागितली. त्यानंतर तिघेही एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेले. परतताना फिर्यादी हे एकटेच दुचाकीने घराकडे निघाले, तर आरोपी हा त्या महिलेला घेऊन ऑटोरिक्षाने निघाला. ती रात्री ३ च्या सुमारास घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर आरोपी आसिफ खान याने आपल्याला ऑटोत मारहाण केली तथा तो शिवीगाळदेखील करत होता, अशी तक्रार पतीकडे केली. त्यावेळी फिर्यादीने डायल ११२ वर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर ते दाम्पत्य कोतवालीत तक्रारीसाठी पोहोचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती