शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

'आम्ही वर गेल्यावर करणार का सुधारणा ?'

By admin | Updated: June 7, 2016 07:35 IST

मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे.

२० वर्षांपासून समस्या कायम : दत्तकृपा, जयभोले, नेताजी, गाडगेबाबा कॉलनीतील नागरिकांचा सवालअमरावती : मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे. महापालिका, नगरसेवक या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात तर फार बिकट स्थिती असते. या समस्या सोडविल्या जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक फार संतापले आहेत. त्यामुळे आम्ही वर गेल्यावर सुधारणा करणार का, असा त्यांचा संतप्त सवाल आहे. या परिसरात सुरुवातीच्या भागात नाल्या आहेत. नंतरच्या परिसरात नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाण्याची मोठी डोकेदुखी आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली आहे. डासांचा उच्छाद आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्याची तर पुरती वाट लागली आहे. महापालिकेने नव्हे तर आमदार निधीतून रस्ते व बगिच्याला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. दत्तकृपा कॉलनीतील एका रस्त्यावर सहा महिन्यांपासून मुरुम व गिट्टी टाकली आहे. परंतु अद्याप काम पुढे सरकलेच नाही. बगिच्यालगत एका प्राध्यापकाने घरचे सांडपाणी नालीत न सोडता बगिच्याजवळ खोल खड्डा करून त्यात सोडले आहे. तेथे लहान मुले खेळतात. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरातील अनेक पथदिवे दिवसभर सुरू राहतात, बंद पडल्यास कित्येक दिवस सुरू होत नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीची मोठी समस्या या परिसरात आहे. तपोवन चौकापासून बराच लांब हा परिसर असल्याने व अंतर्गत रस्ते खराब असल्याने आॅटो या भागात येत नाहीत. कुणी आजारी पडल्यास उपचारार्थ दवाखान्यात नेण्यासाठी आॅटोदेखील मिळत नाही. त्यामुळे येथे आॅटो स्टँड असावा. शहर बससेवादेखील सुरू करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. अमरावती ते आर्वी हा राज्य महामार्ग या परिसरातून जातो. या मार्गावर नेहमी रेतीची जड वाहतूक केली जाते त्यामुळे रस्ते खराब होऊन अपघाताची शक्यता आहे, बगीच्याजवळ असणाऱ्या डीबीमधून वारंवार स्पार्कींग होते. या ठिकाणी मुले खेळतात हा प्रकारदेखील धोकादायक असल्याचे महिलांनी सांगितले. महापालिकेद्वारा कचरा पेटी, घंटागाडी आदी कुठलीही सुविधा नाही. सफाई कामगार फिरकत नाही. लेआऊटमधील मोकळ्या जागेत बगीचा नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही सुविधा नाही. महिलांनी सामूहिकरीत्या कार्यक्रम करावा, यासाठी एखादा हॉल असावा, वाचनालय, रुग्णालय, शाळा, रुग्णवाहिका आदी कसल्याच सुविधा नाहीत. अलीकडेच चोऱ्यांचेदेखील प्रमाण या भागात वाढले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी पदरचे पैसे खर्च करून मुरूम टाकला आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. आधीच भरपूर समस्या असताना त्यात आणखी भर पडणार आहे. आम्ही महापालिकेचा टॅक्स भरत असताना आम्हाला इतर प्रभागाप्रमाणे सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)