शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

'आम्ही वर गेल्यावर करणार का सुधारणा ?'

By admin | Updated: June 7, 2016 07:35 IST

मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे.

२० वर्षांपासून समस्या कायम : दत्तकृपा, जयभोले, नेताजी, गाडगेबाबा कॉलनीतील नागरिकांचा सवालअमरावती : मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे. महापालिका, नगरसेवक या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात तर फार बिकट स्थिती असते. या समस्या सोडविल्या जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक फार संतापले आहेत. त्यामुळे आम्ही वर गेल्यावर सुधारणा करणार का, असा त्यांचा संतप्त सवाल आहे. या परिसरात सुरुवातीच्या भागात नाल्या आहेत. नंतरच्या परिसरात नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाण्याची मोठी डोकेदुखी आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली आहे. डासांचा उच्छाद आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्याची तर पुरती वाट लागली आहे. महापालिकेने नव्हे तर आमदार निधीतून रस्ते व बगिच्याला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. दत्तकृपा कॉलनीतील एका रस्त्यावर सहा महिन्यांपासून मुरुम व गिट्टी टाकली आहे. परंतु अद्याप काम पुढे सरकलेच नाही. बगिच्यालगत एका प्राध्यापकाने घरचे सांडपाणी नालीत न सोडता बगिच्याजवळ खोल खड्डा करून त्यात सोडले आहे. तेथे लहान मुले खेळतात. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरातील अनेक पथदिवे दिवसभर सुरू राहतात, बंद पडल्यास कित्येक दिवस सुरू होत नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीची मोठी समस्या या परिसरात आहे. तपोवन चौकापासून बराच लांब हा परिसर असल्याने व अंतर्गत रस्ते खराब असल्याने आॅटो या भागात येत नाहीत. कुणी आजारी पडल्यास उपचारार्थ दवाखान्यात नेण्यासाठी आॅटोदेखील मिळत नाही. त्यामुळे येथे आॅटो स्टँड असावा. शहर बससेवादेखील सुरू करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. अमरावती ते आर्वी हा राज्य महामार्ग या परिसरातून जातो. या मार्गावर नेहमी रेतीची जड वाहतूक केली जाते त्यामुळे रस्ते खराब होऊन अपघाताची शक्यता आहे, बगीच्याजवळ असणाऱ्या डीबीमधून वारंवार स्पार्कींग होते. या ठिकाणी मुले खेळतात हा प्रकारदेखील धोकादायक असल्याचे महिलांनी सांगितले. महापालिकेद्वारा कचरा पेटी, घंटागाडी आदी कुठलीही सुविधा नाही. सफाई कामगार फिरकत नाही. लेआऊटमधील मोकळ्या जागेत बगीचा नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही सुविधा नाही. महिलांनी सामूहिकरीत्या कार्यक्रम करावा, यासाठी एखादा हॉल असावा, वाचनालय, रुग्णालय, शाळा, रुग्णवाहिका आदी कसल्याच सुविधा नाहीत. अलीकडेच चोऱ्यांचेदेखील प्रमाण या भागात वाढले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी पदरचे पैसे खर्च करून मुरूम टाकला आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. आधीच भरपूर समस्या असताना त्यात आणखी भर पडणार आहे. आम्ही महापालिकेचा टॅक्स भरत असताना आम्हाला इतर प्रभागाप्रमाणे सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)