शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नोकरीचा हक्क नसणारी ‘टीईटी’ कशासाठी?

By admin | Updated: November 2, 2014 22:27 IST

जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली

गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली तरीही उमेदवारांना नोकरीसाठी कुठलाही हक्क राहणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे थेट नोकरी न देणारी ‘टीईटी’ आहे तरी कशासाठी? असा सवाल भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण संचालनालयाची अध्यापक पदविका परीक्षा व त्यानंतर ‘टिईटी’ परीक्षा कशासाठी? शासनाने स्वत: घेतलेल्या निर्णयावर विश्वास नाही काय? यासह अनेक प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केले आहे. हे प्रश्न तूर्तास अनुत्तरितच आहे.डीएडसाठी प्रवेश देताना इयत्ता १२ वी पास हा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे सरगकत परीक्षा अर्ज भरुन देण्याऐवजी परीक्षा अर्ज भरताना १२ वी पास व नंतर डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना एक पेपर तसेच डीएड व पदव्यूत्तर भावी शिक्षकांना दोन परीक्षा अर्ज भरावे लागले. यासाठी अतिरिक्त शुल्काची रक्कम मोजावी लागत आहे. डीएड प्रवेश ते परीक्षा या प्रक्रियेत खर्च पुरविताना पालकांच्या नाकीनऊ आले. आता टीईटीसाठी पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागत आहे. पालकांसाठी हे अवघड आहे. मात्र हे शुल्क भरुन परीक्षा दिल्यानंतरही नोकरीचा हक्क नसणारी ही परीक्षा आहे. परीक्षेसाठी एकाचे निकष लावले जावेत, अशी भावी शिक्षकांची मागणी आहे. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांची अद्याप इतरत्र नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांना सेवेत केव्हा सामावले जाणार, हा प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.