शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नोकरीचा हक्क नसणारी ‘टीईटी’ कशासाठी?

By admin | Updated: November 2, 2014 22:27 IST

जिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली

गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील १५ हजारांवर भावी शिक्षकांनी ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेचे अर्ज मागील आठवड्यात भरले. आता पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षेची काळजी सुरु आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केली तरीही उमेदवारांना नोकरीसाठी कुठलाही हक्क राहणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे थेट नोकरी न देणारी ‘टीईटी’ आहे तरी कशासाठी? असा सवाल भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण संचालनालयाची अध्यापक पदविका परीक्षा व त्यानंतर ‘टिईटी’ परीक्षा कशासाठी? शासनाने स्वत: घेतलेल्या निर्णयावर विश्वास नाही काय? यासह अनेक प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केले आहे. हे प्रश्न तूर्तास अनुत्तरितच आहे.डीएडसाठी प्रवेश देताना इयत्ता १२ वी पास हा निकष लावण्यात आला होता. त्यामुळे सरगकत परीक्षा अर्ज भरुन देण्याऐवजी परीक्षा अर्ज भरताना १२ वी पास व नंतर डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना एक पेपर तसेच डीएड व पदव्यूत्तर भावी शिक्षकांना दोन परीक्षा अर्ज भरावे लागले. यासाठी अतिरिक्त शुल्काची रक्कम मोजावी लागत आहे. डीएड प्रवेश ते परीक्षा या प्रक्रियेत खर्च पुरविताना पालकांच्या नाकीनऊ आले. आता टीईटीसाठी पुन्हा नव्याने शुल्क भरावे लागत आहे. पालकांसाठी हे अवघड आहे. मात्र हे शुल्क भरुन परीक्षा दिल्यानंतरही नोकरीचा हक्क नसणारी ही परीक्षा आहे. परीक्षेसाठी एकाचे निकष लावले जावेत, अशी भावी शिक्षकांची मागणी आहे. जिल्ह्यात शेकडो शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांची अद्याप इतरत्र नियुक्ती करण्यात आली नाही. त्यांना सेवेत केव्हा सामावले जाणार, हा प्रश्न भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.