शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

का ओढविली पोलिसांवर नामुष्की?

By admin | Updated: August 26, 2015 00:02 IST

अमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती.

गणेश देशमुख अमरावतीअमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. गावकऱ्यांचा पोलिसांवर जहाल रोष निर्माण झाल्यामुळे शस्त्रसज्ज पोलिसांना शेतांच्या धुऱ्याने पळावे लागले. कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठीच नेमणूक असलेल्या पोलीसांना गावात जाण्याचे धैर्य उरू नये, जीव मुठीत घेऊन माहुली ठाण्याचा आधार घ्यावा लागावा, ही बाब चिंतनीयच!ज्यांच्या शिरावर कायदा अबाधित राखण्याची जबाबदारी होती ते पोलीस गावाबाहेर थांबलेले आणि आमदारांसह महसूल प्रशासनाची चमू कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात गावात गुंतलेली, असे आगळे चित्र मंगळवारी माहुलीत होते. ज्वालामुखीसमान खदखदणाऱ्या गावकऱ्यांसमोर जाणे, त्यांचे समाधान करणे हे कार्य जितके धोक्याचे तितकेच ते लढवय्य बाणा अन् चाणाक्ष बुद्धीमत्तेचा कस लावणारेही होते. आमदार, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या चमूने हे कार्य लिलया पार पाडले. साहिलचा अंत्यविधी होईस्तोवर ही मंडळी आत्मविश्वासाने तेथे होती. तथापि, हे हे धाडस पोलीस दाखवू शकले नाहीत. पोलिसांवर उद्भवलेला प्रसंग बाका होता. त्याचे समर्थन होऊ नयेच. पण ही स्थिती पोलिसांनीच स्वत:वर ओढवून घेतली असेल तर त्याचे 'आॅपरेशन' जरूर व्हायलाच हवे.सामान्य पोलिसांवर संकट ओढवत असले तर अशावेळी धुरा त्यांच्या सेनापतीने सांभाळायला हवी. घटनास्थळी जातीने हजर राहून वरिष्ठांनी स्थिती हाताळणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुबाब मोठा असतो. त्यांचे अधिकार व्यापक असतात. अवघ्या पोलिसांचे ते प्रेरणास्थान असतात. त्यांची बुद्धीमत्ताही कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असते. अशा बिकट समयी स्थिती कशी हाताळायची, नियंत्रण कसे मिळवायचे, हारलेली बाजी कशी जिंकायची याचे प्रशिक्षणच वरिष्ठांनी स्वकृतीतून कनिष्ठांपुढे सादर करायचे असते. माहुलीच्या घटनेत वरिष्ठांना ही संधी होती, मात्र त्यांनी ती गमावली. लोकविश्वास परत मिळवावा!गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला म्हणून त्यांच्याविरुद्ध आकसाने खटले भरणे हा सुदृढ लोकशाही जपण्यासाठीचा उपाय असू शकत नाही. आयुष्यातील संघर्षाचा सामना करून थकल्यावर जीवन संपविणाऱ्या 'शेतकरी जमाती'तील मनुष्यप्रण्यांची संख्या माहुली गावात जास्त आहे. कुणाविरुद्ध आवाज काढण्याची या जमातीची रीतच नाही. तरीही ही मंडळी इतकी का संतापली? का त्यांनी इतका थयथयाट केला? त्यांच्यात हा आक्रोष कुठल्या कारणाने आला, याची उत्तरे शोधणे आणि त्यावर उपचार करणे हा या समस्येवरील खरा उपाय. शेतकरी, शेतमजुरांची ७० ते ८० मुले माहुली गावातून रोज अमरावती येतात. सकाळी ६.४५ वाजता ते त्या गावातून बसगाडीने निघतात. त्यांच्यासाठी वेगळी बसफेरी द्यावी, अशा लाख विनंत्या त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या.