शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुली का म्हणतात, 'शेतकरी नवरा नको गं बाई'? बेभरवशाच्या शेती की कारण अजून काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:02 IST

Amravati : सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे पित्यांनी मत वधू-वर व्यक्त केले

सतीश बहुरूपी लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. शेतीत उत्पन्नाची हमी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी नवरा नकोच, अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता नवरी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. तथापि, एकीकडे 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे. हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित सामान्य नागरिक विचारत आहेत.

पूर्वीचा काळ बघितला, तर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज होता. कालांतराने चक्र बदलले. नोकरी उत्तम, तर शेती ही कनिष्ठ ठरली. या दहा वर्षांच्या काळात शेतीतून उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे.

उत्पन्न जरी सरासरीएवढेच होत असेल तरी मिळणारा बाजारभाव व लागवड खर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, बरेचदा शेती तोट्यातही जाते. दुसरीकडे जन्मदर तफावत, शेतीबद्दल शासनाची अनास्था, मुलींचे उच्च शिक्षण आदी बाबीदेखील 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणण्यास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे मत वधू-वर पित्यांनी व्यक्त केले.

ही आहेत कारणे

  • शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही शहरात नोकरी करणारा नवरा हवा आहे.
  • मुंबई, पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला तसेच स्वतंत्र फ्लॅट असलेल्या मुलाला प्राधान्य, तर शेतात राबणारा मुलगा नकोसा झाला आहे.
  • शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास मुलगी सुखात राहणार नाही, उन्हातान्हात शेतीची कामे करावी लागतील, या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाहीत.
  • नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही, याच माहिती आवर्जून विचारली जाते. प्रत्यक्षात शेतीळा दुय्यम ठरवून नोकरीलाच प्राधान्य दिल्या जाते.
टॅग्स :farmingशेतीAmravatiअमरावती