शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

मुली का म्हणतात, 'शेतकरी नवरा नको गं बाई'? बेभरवशाच्या शेती की कारण अजून काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:02 IST

Amravati : सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे पित्यांनी मत वधू-वर व्यक्त केले

सतीश बहुरूपी लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. शेतीत उत्पन्नाची हमी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी नवरा नकोच, अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता नवरी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. तथापि, एकीकडे 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे. हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित सामान्य नागरिक विचारत आहेत.

पूर्वीचा काळ बघितला, तर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज होता. कालांतराने चक्र बदलले. नोकरी उत्तम, तर शेती ही कनिष्ठ ठरली. या दहा वर्षांच्या काळात शेतीतून उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे.

उत्पन्न जरी सरासरीएवढेच होत असेल तरी मिळणारा बाजारभाव व लागवड खर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, बरेचदा शेती तोट्यातही जाते. दुसरीकडे जन्मदर तफावत, शेतीबद्दल शासनाची अनास्था, मुलींचे उच्च शिक्षण आदी बाबीदेखील 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणण्यास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे मत वधू-वर पित्यांनी व्यक्त केले.

ही आहेत कारणे

  • शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही शहरात नोकरी करणारा नवरा हवा आहे.
  • मुंबई, पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला तसेच स्वतंत्र फ्लॅट असलेल्या मुलाला प्राधान्य, तर शेतात राबणारा मुलगा नकोसा झाला आहे.
  • शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास मुलगी सुखात राहणार नाही, उन्हातान्हात शेतीची कामे करावी लागतील, या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाहीत.
  • नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही, याच माहिती आवर्जून विचारली जाते. प्रत्यक्षात शेतीळा दुय्यम ठरवून नोकरीलाच प्राधान्य दिल्या जाते.
टॅग्स :farmingशेतीAmravatiअमरावती