शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मुली का म्हणतात, 'शेतकरी नवरा नको गं बाई'? बेभरवशाच्या शेती की कारण अजून काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:02 IST

Amravati : सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे पित्यांनी मत वधू-वर व्यक्त केले

सतीश बहुरूपी लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. शेतीत उत्पन्नाची हमी राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी नवरा नकोच, अशी धारणा होऊ लागल्याने शेती करणाऱ्या वराला आता नवरी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. तथापि, एकीकडे 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणणाऱ्या वधूला व वधूच्या नातेवाइकांना नोकरीवर असलेल्या मुलाकडे शेती पाहिजे. हा खटाटोप कशाला, असा प्रश्न उपस्थित सामान्य नागरिक विचारत आहेत.

पूर्वीचा काळ बघितला, तर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज होता. कालांतराने चक्र बदलले. नोकरी उत्तम, तर शेती ही कनिष्ठ ठरली. या दहा वर्षांच्या काळात शेतीतून उत्पन्न खर्चाच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे.

उत्पन्न जरी सरासरीएवढेच होत असेल तरी मिळणारा बाजारभाव व लागवड खर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मिळणारा नफा हा फारच कमी असून, बरेचदा शेती तोट्यातही जाते. दुसरीकडे जन्मदर तफावत, शेतीबद्दल शासनाची अनास्था, मुलींचे उच्च शिक्षण आदी बाबीदेखील 'शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणण्यास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत सामाजिक जागृती होण्याची गरज असल्याचे मत वधू-वर पित्यांनी व्यक्त केले.

ही आहेत कारणे

  • शेतकरी कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींनाही शहरात नोकरी करणारा नवरा हवा आहे.
  • मुंबई, पुणे यांसारख्या शहरात नोकरी असलेला तसेच स्वतंत्र फ्लॅट असलेल्या मुलाला प्राधान्य, तर शेतात राबणारा मुलगा नकोसा झाला आहे.
  • शेतकरी मुलाला मुलगी दिल्यास मुलगी सुखात राहणार नाही, उन्हातान्हात शेतीची कामे करावी लागतील, या काळजीने पालकही मुलगी द्यायला तयार होत नाहीत.
  • नोकरी करणाऱ्या मुलाकडे शेती आहे की नाही, याच माहिती आवर्जून विचारली जाते. प्रत्यक्षात शेतीळा दुय्यम ठरवून नोकरीलाच प्राधान्य दिल्या जाते.
टॅग्स :farmingशेतीAmravatiअमरावती