शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला, निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 00:01 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाची १३ वर्षांपासून विकासकामे सुरू होऊनही आजतायागत विमानतळ पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे विकास का रखडला आणि निधी गेला कुठे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.  राज्यात इतर विभागीय मुख्यालयेच नव्हे, तर नांदेड, लातूर, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया आदी जिल्हा व तालुकास्तरावर विमानतळ  झाले आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये विमानतळ विकासासाठी पीआयएल क्रमांक ४८/ २०२२ अन्वये जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढा उभारला आहे. ही जनहित याचिका बुधवारी नायमूर्ती जी.ए. सानप व न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठाने सुनावणीकरिता दाखल करून घेतली. ॲड. प्रवीण पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एप्रिल २०२२ मध्ये ती सादर करण्यात आली, हे विशेष.

म्हणून एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’रखडले विमानतळ, धावपट्टीचे ओएलएस सर्वेक्षण करून विस्तृत आरखडा तयार करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात एटीआर-७२ विमानाचे उड्डाणासाठी नाइट लँडिंग सुविधा, धावपट्टी १३७२ मीटर लांबीऐवजी १८५० मीटरपर्यंत करण्यात आली. विकासकामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध केला. १३ जुलैे २०१९ विमानतळ विस्तारीकरणाची पायाभरणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, धावपट्टीच्या विस्तारीकरण अंतिम टप्प्यात रखडले. नऊ कोटींअभावी डांबराचा सिल्क कोट तयार झाला नाही. त्यामुळे एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’ होऊ शकले नाही. आता माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी न्यायालयीन लढा हाती घेतला आहे.

 

टॅग्स :Airportविमानतळ