शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला, निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 00:01 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.  माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाची १३ वर्षांपासून विकासकामे सुरू होऊनही आजतायागत विमानतळ पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे विकास का रखडला आणि निधी गेला कुठे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी संचालक यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या याचिकेनुसार, राज्याचे सातवे मोठे व विभागीय मुख्यालयाचे शहर अमरावती येथे विमानतळ उपलब्ध झाले नाही.  राज्यात इतर विभागीय मुख्यालयेच नव्हे, तर नांदेड, लातूर, कोल्हापूर, जळगाव, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया आदी जिल्हा व तालुकास्तरावर विमानतळ  झाले आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये विमानतळ विकासासाठी पीआयएल क्रमांक ४८/ २०२२ अन्वये जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढा उभारला आहे. ही जनहित याचिका बुधवारी नायमूर्ती जी.ए. सानप व न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या खंडपीठाने सुनावणीकरिता दाखल करून घेतली. ॲड. प्रवीण पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एप्रिल २०२२ मध्ये ती सादर करण्यात आली, हे विशेष.

म्हणून एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’रखडले विमानतळ, धावपट्टीचे ओएलएस सर्वेक्षण करून विस्तृत आरखडा तयार करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात एटीआर-७२ विमानाचे उड्डाणासाठी नाइट लँडिंग सुविधा, धावपट्टी १३७२ मीटर लांबीऐवजी १८५० मीटरपर्यंत करण्यात आली. विकासकामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध केला. १३ जुलैे २०१९ विमानतळ विस्तारीकरणाची पायाभरणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, धावपट्टीच्या विस्तारीकरण अंतिम टप्प्यात रखडले. नऊ कोटींअभावी डांबराचा सिल्क कोट तयार झाला नाही. त्यामुळे एटीआर-७२ चे ‘टेक ऑफ’ होऊ शकले नाही. आता माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी न्यायालयीन लढा हाती घेतला आहे.

 

टॅग्स :Airportविमानतळ