शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

खटल्यांना विलंब का?

By admin | Updated: November 26, 2014 22:58 IST

जिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल आहेत. २७० प्रकरणांत तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहे. साधारणपणे ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित

वांझोटे सोयाबीन बियाणे : २७० नमुने सदोष, १०० नापास, केसेस फक्त २१गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यात उगवणशक्ती नसल्याबाबत सोयाबीनच्या ४९८ तक्रारी दाखल आहेत. २७० प्रकरणांत तक्रार निवारण समितीने बियाणे सदोष ठरविले आहे. साधारणपणे ९० नमुने प्रयोगशाळेत नापास ठरले. अप्रमाणित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. तरीही निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर खटले दाखल करण्यास विलंब का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.खरीप हंगाम संपायला आला असताना तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे निकृष्ट बियाण्यांची केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. तर केवळ ७८ शेतकऱ्यांना बियाणे व रोख स्वरुपात भरपाई मिळाली. अन्य शेकडो प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या परंतु न उगवलेल्या सोयाबीन बियाण्यांबाबतच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल आहेत. न्यायालयीन दाव्यांसाठी यापैकी किमान १०० प्रकरणे पात्र आहेत. परंतु कृषी विभागाने आतापर्यंत केवळ २१ प्रकरणे न्यायालयात दाखल केली. उर्वरित ७० ते ८० प्रकरणे अद्यापही न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाहीत. बियाण्यांचे नमुने घेणाऱ्या पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवंलबिले आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. खरीप हंगाम संपून रबीची पेरणी सुरू झाली आहे.