शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वन विभागात मनुष्यबळ पुरवणारी संस्था कुणाची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:59 IST

Nagpur : नागपूरच्या वन भवनात 'त्या' अधिकाऱ्यांची 'पोस्टिंग पे पोस्टिंग'

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथील वन भवनाचा कारभार हल्ली सेवानिवृत्त अधिकारी हाकत असल्याचे वास्तव आहे. गतवर्षी जुलै २०२४ मध्ये चार सेवानिवृत्त विभागीय वनाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र शासन निर्णयाची तीन वर्षे अनुभवाची अट पूर्ण न करणाऱ्या अपात्र अधिकाऱ्यांना पुन्हा पोस्टिंग देण्यात आली. त्यामुळे वन विभागात मनुष्यबळ पुरवठा करणारी संस्था कुणाची? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

१७ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त वन अधिकाऱ्यांना पुन्हा कर्तव्यावर घेताना त्यांना तीन वर्षे अनुभवाची अट घातली आहे. मात्र नागपूर येथील वन भवनात आधीपासून कार्यरत काही सेवानिवृत्त विभागीय वन अधिकाऱ्यांनी देखील पुन्हा अर्ज भरले होते आणि पुन्हा त्यांनाच नियुक्त देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर तेच काम पुन्हा देण्याचा वन विभागाने घाट घातला होता. जुलै २०२४ च्या जाहिरातीनुसार पात्र असलेल्या काही अर्जदारांना मुद्दाम डावलण्यात आले आणि आधीच कामावर असलेल्या मर्जीतील काहींना पुनःश्च कर्तव्यावर घेतले.

अपात्र वन अधिकाऱ्यांसाठी शासनाकडे प्रस्ताववयाने अपात्र ठरलेले, ज्यांनी पासष्टी पार केली त्यांना पात्र करावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरी न मिळाल्याने 'त्याच-त्या' मर्जीतील अधिकाऱ्यांची सेवा 'त्याच त्या' कामासाठी घेण्याची एका मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून करार तत्वावर बेकायदा सोय करून घेण्यात आली. त्यासाठी जुलै २०२४ मध्ये निविदा जाहिरात काढण्यात आली होती.वन विभागासह अन्य विभागातही असाच सेवानिवृत्तांचे कामविना 'पोटभरण'सुरू आहे.या गंभीर प्रकारामुळे शासन तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. या विषयाकडे वन मंत्री गणेश नाईक, वन खात्याचे सचिवांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.

जाहिरातीनुसार अनेक पदांपैकी एक पद सल्लागार / समन्वयक होते. ज्याची पात्रता विभागीय वन अधिकारी पदाचा केवळ एक वर्ष अनुभव असावा, अशी नमूद होती. मात्र त्यात 'सेवानिवृत्त' विभागीय वन अधिकारी असा उल्लेख नव्हता.एक वर्ष अनुभव असलेला विभागीय वन अधिकारी अशी अर्हता असल्याच्या साहजिकच अटीनुसार केवळ सेवानिवृत्त अधिकारीच मिळणार होते. या जाहिरातीत सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असा उल्लेख मुद्दामच टाळण्यात आला.मर्जीतील लोकांना पुनःश्च कर्तव्यावर घेण्यात सामान्य प्रशासन विभागाचा १७ डिसेंबर २०१६ रोजीचा शासन निर्णय अडसर ठरत होता, त्यामुळे त्याचा अवलंब टाळता यावा यासाठीच ही खेळी करण्यात आली होती.

"राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २०१६ च्या निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेता येते. मात्र प्रशासन विभागात तशी कुणालाही नियुक्ती दिलेली नाही. वन भवनातील अन्य विभागाची मला माहिती नाही."- सी. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक व प्रशासन) वन विभाग

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती