शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात कुलसचिवपदाची धुरा कोण सांभाळणार? कुलगुरूंसमोर पेच

By गणेश वासनिक | Updated: May 16, 2024 21:42 IST

कार्यभार देण्यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध सुरू

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचा कार्यकाळ येत्या १९ मे रोजी पूर्ण होत असून त्यांचा कार्यभार कुणाला द्यावा, यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध कुलगुरूंनी सुरू केला आहे. गत पाच वर्षात विद्यापीठाची दुरवस्था, प्राधिकारणीसमोर उठलेले विविध प्रश्न, नॅकचा घसरलेला दर्जा, अधिसभा निवडणुकीत अनुभवहीन अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे निर्माण झालेली न्यायालयीन प्रकरणे, माजी रासेयो संचालकांचे गाजलेले अग्रीम प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पात्र अधिकारी /प्राध्यापकास कुलगुरूंनी स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानापन्न नियुक्ती म्हणजे काय?

कुलसचिवांचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीकरिता चार्ज दिला जातो तेव्हा तो पूर्णकालीन कार्यभार गणला जातो आणि कुलसचिवपदाच्या वेतनाकरिताही ग्राह्य मानण्यात येतो. स्थानापन्न नियुक्ती ही पूर्णवेळ नियुक्ती गणली जात असल्याने व नियमित वेतनश्रेणी अंतर्गत येत असल्याने ही नियुक्ती देताना नियमानुसार कुलसचिवपदासाठी पात्र व्यक्तीलाच स्थानापन्न नियुक्ती देणे गरजेचे असते.

कोण आहे पात्रताधारक?

स्थानापन्न कुलसचिवांचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सध्या कार्यरत एकही उपकुलसचिव पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाहीत. विद्यापीठात उपकुलसचिवांपैकी डॉ. सुलभा पाटील व डॉ. दादाराव चव्हाण हे पीएच. डी. आहेत. परंतु अनुभवाची अट पूर्ण करीत नाहीत तर मीनल मालधुरे व मोनाली तोटे यांच्यासह ऋतुराज दशमुखे, मंगेश वरखेडे, विक्रांत मालविय, मंगेश जायले हे अधिकारी पीएच. डी. नाहीत. विद्यमान वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, डॉ. मो. अतिक, डॉ. अविनाश असनारे व डॉ. प्रशांत गावंडे हे पात्रतेच्या अटी पूर्ण करतात; परंतु ते अर्जदार आहेत. अनुभवाचा विचार करता डॉ. एस. व्ही. डुडूल, डॉ. मोना चिमोटे, डॉ. डी. वाय. चाचरकर अथवा डॉ. अनिता पाटील यापैकी कोणाकडे स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार जातो, हे बघावे लागेल.

डॉ. तुषार देशमुखांना नारळ कधी?

कुलसचिव डॉ. तुषार देशमुखांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी १९ मे रोजी पूर्ण होत आहे. कुलसचिवांना रविवार ऐवजी शनिवारी कार्यमुक्त करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे तर रविवारी कार्यमुक्त करण्यासाठी देशमुख आग्रही असल्याचे समजते. अनेकांना दरमहा नारळ देणाऱ्या कुलसचिवांना नियमबद्ध प्रशासन कधी नारळ देणार, याची चर्चा विद्यापीठात रंगली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती