शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या ‘त्या’ ग्रामसेवकाला अभय कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST

श्यामकांत पाण्डेय धारणी : आदिवासी भागात साखळी पद्धतीने सुरू असलेल्या ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेचे काही सदस्य ...

श्यामकांत पाण्डेय

धारणी : आदिवासी भागात साखळी पद्धतीने सुरू असलेल्या ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेचे काही सदस्य खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील साद्राबाडी ग्रामपंचायतीच्या सचिवांना विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या निधी अफरातफरप्रकरणी जलसंपदा राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी निलंबित केले होते. परंतु, एका विशिष्ट जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याच्या आत त्या ग्रामसेवकाचे निलंबन रद्द करवून घेतले.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्यावर याच प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्या ग्रामसेवकाचे निलंबन रद्द ठरविल्याचे बोलले जाते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक निधी उपलब्ध आहे, त्या ग्रामपंचायतीचा नियमबाह्य पदभार तात्पुरता त्या ग्रामसेवकाकडे सोपविण्यात येत होता. एकदा पैसे काढून झाल्यावर पुन्हा त्या ग्रामसेवकाकडून पदभार काढून घेतला जात होता. मेळघाटातील ग्रामपंचायतींमध्ये होणारा भ्रष्टाचार सामूहिकरीत्या चालत असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले असल्यामुळे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशी होणे शक्य होत नाही, असा आजपर्यंतच्या अनुभव आहे.

बॉक्स

पाच-सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून कोट्यावधीचा निधी खर्च केला जात असून, ग्रामपंचायतीने राबविलेली अनेक बांधकामे बेपत्ता आहेत. काही कामांचे अवशेषच दिसून येतात. गैरप्रकारात तरबेज असणाऱ्या त्या ग्रामसेवकाने धारणमहू, शिरपूर, बिजुधावडी, साद्राबाडी अशा ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधीचा अपहार केल्याने बच्चू कडू यांनी त्याला तातडीने निलंबित केले होते. मात्र, मेळघाटातील विशिष्ट जिल्हा परिषद सदस्य वजनदार ठरल्याने राज्यमंत्र्यांच्या आदेशाची अवमानना करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया मेळघाटात व्यक्त होत आहे. मेळघाटातील ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेला भ्रष्टाचार पोखरून काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी नवनियुक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पांडा यांच्यावर आली आहे.

----------------------